Metro : अखेर मेट्रोच्या श्यामनगर स्टेशनचा प्रश्न सुटला!

जेव्हीएलआरवरील ऑबेरॉयच्या जागेत मेट्रो रेल्वेची तिकीट खिडकी, स्टेशन बिल्डिंग, जिना व अन्य सुविधा


खासदार रविंद्र वायकरांनी घेतली प्रलंबित प्रश्नांसाठी के (पूर्व) चे सहायक आयुक्तांसमवेत बैठक


मुंबई : जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील मेट्रो ६ च्या मार्गाचे काम अंदाजे ७० टक्के पूर्ण झाले असून या ठिकाणी श्याम नगर मेट्रो स्टेशन (Shyamnagar Metro station) उभारण्याचा प्रलंबित प्रश्नही निकाली निघाला आहे. आता हे स्टेशन जे.व्ही.एल.आर श्याम नगर सिग्नल जवळच उभारण्यात येणार असून या स्टेशनची तिकीट खिडकी, स्टेशन बिल्डिंग, जिना व अन्य सुविधा ऑबेरॉय विकासकाच्या जागेतच करण्यात येणार आहे. त्याला ऑबेरॉय विकासकाने तयारी दर्शवली आहे. मुंबई उत्तर पश्चिम खासदार रविंद्र वायकर यांनी या व विभागातील अन्य प्रश्नांसंदर्भात बैठेक घेतली होती. त्यावेळी मेट्रोचे अधिकारी यांनी हि माहिती खासदार यांना दिली. तसेच श्याम नगर ते पश्चिम द्रुतगती महामार्ग पर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचे कामही लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी सूचनाही खासदार यांनी संबंधित अधिकारी यांना दिल्या.


उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नासंदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीला के (पूर्व) चे सहायक आयुक्त मनीष वळूंज, धुमाळे, सोनावणे, मेट्रोचे अधिकारी जमादार, नवले आदी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सारीपुतनगर येथे लॉट १२ चे शौचालय बांधणे, निर्मलाताई राजेश्वर रागींणवार मंडईतील अत्यंत खराब व बंद अवस्थे असलेले शौचालय बांधणे, मजासवाडी मनोरमा बिल्डिंगची संरक्षण भिंत कोसळल्याने नाला प्रवाह बंद होऊन मागील वर्षी पावसात झालेल्या नुकसानाबाबत, लोकमान्य टिळक श्याम नगर तलाव, जेव्हीएलआर ओलांडून मजास नाल्यावर बांधलेली पॅरापेट काढून (बोटलनेक) काढून वाहतूक सुरळीत करणे, जोगेश्वरी पूर्व स्टेशन जवळील पादचारी पुलावरील बंद पडलेले सरकते जिने, दत्ताजी साळवी मार्केटची दुरवस्था आदी विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.



यावेळी मेट्रोचे अधिकारी नवले यांनी जेव्हीएलआर ओलांडून मजास नाल्यावर बांधलेली पॅरापेट १४ एप्रिलपर्यंत काढण्यात येईल, असे आश्वासन दिले. रामवाडी ते दत्तटेकडी रस्ता २५ मीटर रुंद करण्यासाठी सध्य येथील रस्त्याची जी टोपोग्राफी आहे त्यानुसार रस्ता तयार करण्यात येणार असून दोन्ही बाजूला एकदिशा मार्ग करण्यात येणार आहे. विकास नियोजनमध्ये दाखवण्यात आलेला काशिनाथ गावकर रोड ते जेव्हीएलआर रस्ता जोडण्याचे कामही लवकर सुरु करण्यात येणार असल्याची माहिती अधिकारी यांनी दिली.



मेट्रो स्टेशनचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या खालील जागांचे सुशोभिकरण करण्यात यावे, अशी सूचनाही खासदार यांनी यावेळी दिली. मनोरमा बिल्डिंग येथील कोसळलेली नाल्यावरील संरक्षण भिंत मनपाच्या एस डब्लू डी विभागाने बांधावी, अशा सुचना हि खासदार वायकर यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या. श्याम नगर मेट्रो स्टेशन उभारणीचा प्रश्न सुटल्याने त्याचे काम लवकरात लवकर सुरु करावे, तसेच श्यामनगर ते पश्चिम द्रुतगती महामार्गपर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी अधिकारी यांनी दिल्या. त्याच बरोबर दत्ताजी साळवी, अंधेरी येथील मार्केटचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला असून तो पुढील अंतिम मंजुरीसाठी मुंबई महानगरपालिका आयुक्त याच्याकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती अभियंता यांनी दिली.

Comments
Add Comment

IIT Bombay Hostel Canteen : आयआयटी बॉम्बेच्या 2 हॉस्टेल मेसला टाळं! FDAची मोठी कारवाई; मुंबईतील 4 खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई : अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य आस्थापनांविरोधात महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA)

FYJC Admission 2026 : अकरावी प्रवेशाची शेवटची संधी? आज लागणार कॉलेज अलॉटमेंट लिस्ट; विद्यार्थ्यांनी ‘हे’ नक्की करा!

मुंबई : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

BMC News : महापालिकेच्या सहायक आयुक्तांमध्येच धुसफुस; व्हॉट्सअप ग्रुपवरुन बाहेर पडल्याने नाराजी उघड

- महापालिका आयुक्तांना आता याप्रकरणात लक्ष घालण्याची वेळ मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या

Water Storage Declining : महापालिका धरणांमधील पाणीसाठा घटतोय

- तब्बल ९० टक्क्यांच्या पुढे गेलेला साठा चार दिवसांत दीड टक्क्यांनी झालाय कमी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई पाणी

Global Warming : भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका; मुंबईतील नैसर्गिक जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंग द्वारे सर्वेक्षण करा

- भाजप नगरसेवक प्रतीक कर्पे यांची मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) भविष्यात उद्भवणाऱ्या जागतिक तापमान वाढ (ग्लोबल

Ganeshotsav 2026 ST Buses : बाप्पाच्या आगमनासाठी एसटी सज्ज! मुंबई, ठाणे, पालघरमधून धावणार शेकडो जादा बसेस; ‘या’ तारखेपासून विशेष सेवा

मुंबई : गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली असून, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे.