दोन ॲम्ब्युलन्स उभ्या तरीही चिमुकल्याच्या मृतदेहाची फरफट

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नाकारली शववाहिका


वाडा : भिवंडी तालुक्यातील उसगाव येथील आदिवासी वाडीतील हर्षद जानू मेढा या तेरा वर्षीय मुलाचा बुधवारी सकाळी दरड कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला, त्याच्यासोबत तीन मुलं जखमी देखील झाली. हर्षदचे आईवडील एकुलता एक लेक गेल्याने पार खचून गेले, आता पोरगा गेला आहे, त्याची चिरफाड नको म्हणून ते पोस्टमार्टेमला प्रखर विरोध करत होते. गणेशपुरी पोलिसांनी सर्वोतोपरी प्रयत्न केले, शेवट श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने पालकांना कसेबसे समजावले आणि ते पोस्टमार्टेम साठी तयार झाले. जवळच असलेल्या वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्रात ही सुविधा नाही, पर्याय एकच तो म्हणजे आयजीएम हॉस्पीटल भिवंडी.


उसगाव येथून या चिमुरड्याचा मृतदेह भिवंडी येथे नेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी ॲम्ब्युलन्स देण्यास विरोध केला. अखेर श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ते आणि प्रभारी जिल्हाध्यक्ष प्रमोद पवार यांनी स्वतःच्या खाजगी गाडीत हा मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडी येथे नेला.



एका आदिवासी बालकाच्या मृतदेहाला नेण्यासाठी साधी एक शववाहिनी नाही, उभ्या असलेल्या दोन ॲम्ब्युलन्स नियम आणि अटी दाखवत देण्यास नकार दिला जातो. अखेर पवार यांनी स्वतःच्या गाडीत कसा बसा मृतदेह टाकत शविच्छेदनासाठी नेला, रस्त्यात भिवंडी शहरातून खाजगी शववाहिनी बोलावली, आणि त्यातून पुढील प्रवास केला.


सामान आणि औषधाची वाहतूक करताना नियम बाजूला ठेवले जातात मात्र गरिबाना मृतदेह नेताना ॲम्ब्युलन्स नाकारली जाते हे अत्यंत दुर्दैवी आहे, वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन का होत नाही याचे उत्तर प्रशासनाने दिले पाहिजे, आणि ॲम्ब्युलन्स नाकारणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी यावेळी प्रमोद पवार यांनी केली.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे