दोन ॲम्ब्युलन्स उभ्या तरीही चिमुकल्याच्या मृतदेहाची फरफट

  41

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नाकारली शववाहिका


वाडा : भिवंडी तालुक्यातील उसगाव येथील आदिवासी वाडीतील हर्षद जानू मेढा या तेरा वर्षीय मुलाचा बुधवारी सकाळी दरड कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला, त्याच्यासोबत तीन मुलं जखमी देखील झाली. हर्षदचे आईवडील एकुलता एक लेक गेल्याने पार खचून गेले, आता पोरगा गेला आहे, त्याची चिरफाड नको म्हणून ते पोस्टमार्टेमला प्रखर विरोध करत होते. गणेशपुरी पोलिसांनी सर्वोतोपरी प्रयत्न केले, शेवट श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने पालकांना कसेबसे समजावले आणि ते पोस्टमार्टेम साठी तयार झाले. जवळच असलेल्या वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्रात ही सुविधा नाही, पर्याय एकच तो म्हणजे आयजीएम हॉस्पीटल भिवंडी.


उसगाव येथून या चिमुरड्याचा मृतदेह भिवंडी येथे नेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी ॲम्ब्युलन्स देण्यास विरोध केला. अखेर श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ते आणि प्रभारी जिल्हाध्यक्ष प्रमोद पवार यांनी स्वतःच्या खाजगी गाडीत हा मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडी येथे नेला.



एका आदिवासी बालकाच्या मृतदेहाला नेण्यासाठी साधी एक शववाहिनी नाही, उभ्या असलेल्या दोन ॲम्ब्युलन्स नियम आणि अटी दाखवत देण्यास नकार दिला जातो. अखेर पवार यांनी स्वतःच्या गाडीत कसा बसा मृतदेह टाकत शविच्छेदनासाठी नेला, रस्त्यात भिवंडी शहरातून खाजगी शववाहिनी बोलावली, आणि त्यातून पुढील प्रवास केला.


सामान आणि औषधाची वाहतूक करताना नियम बाजूला ठेवले जातात मात्र गरिबाना मृतदेह नेताना ॲम्ब्युलन्स नाकारली जाते हे अत्यंत दुर्दैवी आहे, वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन का होत नाही याचे उत्तर प्रशासनाने दिले पाहिजे, आणि ॲम्ब्युलन्स नाकारणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी यावेळी प्रमोद पवार यांनी केली.

Comments
Add Comment

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, एसटी साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करणार...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना