बुलढाण्यामध्ये तीन वाहनांचा भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू

बुलढाणा:  बुलढाणा जिल्ह्यात खासगी बस, बोलेरो आणि एसटी बस या तीन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे.  शेगाव-खामगाव महामार्गावर झालेल्या या अपघातात पाच जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

पहाटे साडे पाचच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. यावेळी भरधाव वेगात असलेली बोलेरो कार एसटी बसवर धडकली.  यानंतर पाठीमागून येत असलेल्या खाजगी प्रवासी बसने या अपघातग्रस्त गाड्यांना धडक दिली. 

या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला तर २४ जण यात जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. जखमी झालेल्यांवर खामगाव येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

समोर आलेल्या माहितीनुसार, वेगात असलेली बोलेरो शेगाव येथून कोल्हापुरच्या दिशेने जात होती.  तर एसटी महामंडळाची बस पुणे येथून परतवाडाच्या दिशेने जात होती. या दोन वाहनांची धडक झाली. त्यातच एक खाजगी बस या दोन गाड्यांना धडकली. हा अपघात इतका भीषण होता की ५ जण यात मृत्यूमुखी पडले तर २४ जण जखमी झालेत. 
Comments
Add Comment

शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची राज्यस्तरीय संचालन समिती जाहीर

महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर

Jalna Crime : 'तेच घडलं ज्याची भीती होती!' सख्या दीर-भावजयच्या 'लफड्याची' गावभर चर्चा; अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा निर्घृण खून, बदनापूर परिसरात खळबळ

जालना : अनैतिक प्रेमसंबंधात (Illegal Relationship) अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा दुसऱ्या भावानेच काटा काढल्याची एक धक्कादायक

Chhatrapati Sambhaji Nagar : गाझा मदतीच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? QRने गोळा केलेले लाखो रुपये थेट परदेशात; एटीएसकडून एकाला अटक, काय घडतंय नेमकं?

छत्रपती संभाजी नगर : गाझा-पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मदतीच्या

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे