बुलढाण्यामध्ये तीन वाहनांचा भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू

  42

बुलढाणा:  बुलढाणा जिल्ह्यात खासगी बस, बोलेरो आणि एसटी बस या तीन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे.  शेगाव-खामगाव महामार्गावर झालेल्या या अपघातात पाच जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

पहाटे साडे पाचच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. यावेळी भरधाव वेगात असलेली बोलेरो कार एसटी बसवर धडकली.  यानंतर पाठीमागून येत असलेल्या खाजगी प्रवासी बसने या अपघातग्रस्त गाड्यांना धडक दिली. 

या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला तर २४ जण यात जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. जखमी झालेल्यांवर खामगाव येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

समोर आलेल्या माहितीनुसार, वेगात असलेली बोलेरो शेगाव येथून कोल्हापुरच्या दिशेने जात होती.  तर एसटी महामंडळाची बस पुणे येथून परतवाडाच्या दिशेने जात होती. या दोन वाहनांची धडक झाली. त्यातच एक खाजगी बस या दोन गाड्यांना धडकली. हा अपघात इतका भीषण होता की ५ जण यात मृत्यूमुखी पडले तर २४ जण जखमी झालेत. 
Comments
Add Comment

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या