रत्नागिरी : ट्रकची दुचाकीला धडक, स्वार ठार, ट्रक पेटविला

रत्नागिरी : निवळी-जयगड मार्गावरील चाफे येथे आज सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात खंडाळा येथील तरुण किरण पागदे या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त जमावाने अपघात करणारा ट्रक पेटवून दिला.


हा अपघात चाफे गावाजवळील निवळी-जयगड मार्गावर घडला. ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर मोटरसायकलस्वाराला चारशे फूट फरपटत नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले. या भीषण धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुण खंडाळा येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. परंतु ट्रकच्या बेदरकार चालकामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.



अपघाताची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दुचाकीस्वाराचा मृतदेह रस्त्यावर पडलेला पाहून संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ट्रक जळत असताना धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळांनी परिस्थिती आणखी गंभीर बनवली. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु ग्रामस्थांमध्ये अजूनही संतापाचे वातावरण आहे. नियम तोडून बेफान वाहने चालविणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

Comments
Add Comment

'मी खूप चपला झिजवल्या!'तृप्ती डिमरीने सांगितला बॉलिवूडमधील संघर्षाचा प्रवास

'ॲनिमल' फेम अभिनेत्री तृप्ती डिमरी म्हणते: इंडस्ट्रीत गॉडफादर नसणाऱ्या प्रत्येकासाठी संघर्ष असतो मुंबई: 'ॲनिमल'

ऑक्टोबरमध्ये तब्बल २१ दिवस बँका बंद

मुंबई : पुढील महिन्यातील ऑक्टोबरमध्ये देशभरातील वेगवेगळ्या बँका एकूण २१ दिवस बंद राहणार आहेत. आरबीआयच्या

दसरा सणात मुलांचाही सहभाग महत्त्वाचा!

मुंबई : दसरा म्हणजे विजयाचा, उत्सवाचा आणि आनंदाचा दिवस. पण आजच्या काळात या सणाचा अर्थ फक्त सुट्टी, नवीन कपडे आणि

डोंबिवलीत प्रियकराने केली आत्महत्या, पण नेमकं कारण काय? खरंच प्रेयसीसोबत वाद झाला होता का?

प्रेमसंबंधातील वाद की काहीतरी वेगळं? डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील राहुलनगर परिसरात शनिवारी दुपारी घडलेल्या

Mithun Manhas: अनपेक्षित! मिथुन मन्हास यांची बीसीसीआय अध्यक्षपदी निवड

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी एक आश्चर्यकारक नाव समोर आलं आहे. दिग्गजांची नावं

पूरग्रस्तांसाठी दोन महिला अधिकारी ठरल्या देवदूत!

​पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना दिला आधार! लातूर : अहमदपूर तालुक्यात सुरु झालेल्या मुसळधार पावसाने