Nidhi Tewari : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खासगी सचिवपदी निधी तिवारी यांची नियुक्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खासगी सचिवपदी निधी तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निधी तिवारी या २०२४ च्या आयएफएस बॅचच्या अधिकारी आहेत. डीओपीटीकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, निधी तिवारी या पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून काम करत होत्या. दरम्यान, आता त्यांचं प्रमोशन झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खासगी सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.



निधी तिवारी २०१४ मध्ये इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये भरती झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी विविध आणि महत्त्वपूर्ण पदांवर काम केलंय. पंतप्रधान कार्यालयातील उपसचिव म्हणून त्यांची सेवा वाखाणण्याजोगी असून, त्यादृष्टीने त्यांना नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. निधी तिवारी यांच्यावर पंतप्रधानांचे खासगी सचिव म्हणून महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. हे पद सांभाळताना त्यांना पंतप्रधानांच्या दैनंदिन कामात समन्वय, महत्त्वाच्या बैठका आयोजित करणे आणि विविध सरकारी विभागांशी समन्वय साधावा लागणार आहे.

आयएफएस निधी तिवारी यांची नोव्हेंबर २०२२ मध्ये पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. याआधी, त्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात निशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा प्रकरणांच्या विभागात सचिव म्हणून काम करत होत्या. निधी तिवारीने २०१३ च्या यूपीएससी परीक्षेत केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये ९६ वा क्रमांक मिळवला होता. पहिल्या १०० मध्ये स्थान मिळवल्यामुळे, तिला भारतीय परराष्ट्र सेवा मिळाली. निधीची पहिली पसंती आएफएस होती, त्यानंतर तिने आयएएस आणिआयपीएस होण्याचा मार्ग निवडला होता. आयएफएसमध्ये सामील झाल्यानंतर निधी तिवारी यांनी परराष्ट्र मंत्रालयात आपली सेवा सुरू केली. तेथे त्यांनी निःशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा प्रकरणांमध्ये सचिव म्हणून काम केले.
Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी