नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खासगी सचिवपदी निधी तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निधी तिवारी या २०२४ च्या आयएफएस बॅचच्या अधिकारी आहेत. डीओपीटीकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, निधी तिवारी या पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून काम करत होत्या. दरम्यान, आता त्यांचं प्रमोशन झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खासगी सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निधी तिवारी २०१४ मध्ये इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये भरती झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी विविध आणि महत्त्वपूर्ण पदांवर काम केलंय. पंतप्रधान कार्यालयातील उपसचिव म्हणून त्यांची सेवा वाखाणण्याजोगी असून, त्यादृष्टीने त्यांना नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. निधी तिवारी यांच्यावर पंतप्रधानांचे खासगी सचिव म्हणून महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. हे पद सांभाळताना त्यांना पंतप्रधानांच्या दैनंदिन कामात समन्वय, महत्त्वाच्या बैठका आयोजित करणे आणि विविध सरकारी विभागांशी समन्वय साधावा लागणार आहे.
आयएफएस निधी तिवारी यांची नोव्हेंबर २०२२ मध्ये पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. याआधी, त्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात निशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा प्रकरणांच्या विभागात सचिव म्हणून काम करत होत्या. निधी तिवारीने २०१३ च्या यूपीएससी परीक्षेत केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये ९६ वा क्रमांक मिळवला होता. पहिल्या १०० मध्ये स्थान मिळवल्यामुळे, तिला भारतीय परराष्ट्र सेवा मिळाली. निधीची पहिली पसंती आएफएस होती, त्यानंतर तिने आयएएस आणिआयपीएस होण्याचा मार्ग निवडला होता. आयएफएसमध्ये सामील झाल्यानंतर निधी तिवारी यांनी परराष्ट्र मंत्रालयात आपली सेवा सुरू केली. तेथे त्यांनी निःशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा प्रकरणांमध्ये सचिव म्हणून काम केले.
नवी दिल्ली : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने देश हादरून गेला असतानाच, केंद्र सरकारने…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना राजस्थान रॉयल्सशी होत आहे.…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, मोदी सरकारने पाकिस्तान संबंधित राजकीय, आर्थिक आणि राजनैतिक आघाड्यांवर काही…
१८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली २३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष…
पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…