Santosh Deshmukh : संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? हत्या अनैतिक संबंधातून की दुसऱ्या कारणाने?

  31

Santosh Deshmukh  : संतोष देशमुख प्रकरणात नवा ट्विस्ट


अंजली दमानियांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?


बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांना अडकवण्यासाठी एका महिलेला तयार करण्यात आले होते, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केला आहे. या महिलेची सात-आठ दिवसांपूर्वी हत्या झाल्याची माहिती समोर येत असून, या प्रकरणाने बीडमध्ये खळबळ उडाली आहे.



महिलेचा मृतदेह आणि संशयास्पद हत्येचा तपास


गुरुवार (२७ मार्च २०२५) रोजी बीडमधील कळंब शहरातील द्वारका नगरी वसाहतीत एका महिलेचा मृतदेह घरात सडलेल्या अवस्थेत आढळला. या महिलेने वेगवेगळ्या "मनीषा आकुसकर", "मनीषा बिडवे", "मनीषा बियाणी" आणि "मनीषा गोंदवले" या नावांनी आपली ओळख बदलून विविध ठिकाणी वावर केला होता.



सदर महिला सुदर्शन घुलेच्या संपर्कात होती आणि संतोष देशमुख यांच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी तयार होती, अशी चर्चाही रंगली आहे. मात्र, या दाव्याला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.



हत्या अनैतिक संबंधातून की दुसऱ्या कारणाने?


सदर महिलेला ठार मारण्यामागे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील धागेदोरे नष्ट करण्याचा डाव आहे की तिचा मृत्यू अनैतिक संबंधातून झाला? हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. बीड पोलिसांना ही माहिती उशिराने मिळाली आणि पोलिसांनी घरात प्रवेश केल्यानंतर महिलेचा मृतदेह पूर्णतः सडलेला आढळला.



पोलिस तपास आणि पुढील कारवाई


बीड पोलिसांनी घटनास्थळीच शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार उरकले असून, या हत्येचा सखोल तपास सुरू आहे. शहरात घडलेल्या या घटनेने भय आणि तर्कवितर्कांना उधाण आले असून, पोलिस तपासातूनच आता खरी माहिती समोर येईल, असे बोलले जात आहे.



अंजली दमानियांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?




ही महिला अनेक पुरुषांना अडकवण्याचे काम करायची आणि त्यासाठी ती खाली दिलेल्या नावांचा वापर करायची



१) मनीषा आकुसकर, आडस

२) मनीषा बिडवे, कळंब

३) मनीषा मनोज बियाणी, कळंब

४) मनीषा राम उपाडे, अंबाजोगाई

५) मनीषा संजय गोंदवले, रत्नागिरी
Comments
Add Comment

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित

प्रसाद ओक यांना निळू फुले कृतज्ञता सन्मान जाहीर

पुणे : निळू फुले यांचे कुटुंबीय व बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणारा निळू फुले