Today Gold Rate : सोनं महागलं, ९३ हजारांच्या पार गेलं

मुंबई : अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी आयात केल्या जाणाऱ्या अनेक वस्तूंवर भरमराठ कर अर्थात टॅरिफ लावण्यास सुरुवात केली आहे. ट्रम्प प्रशासनाने हा निर्णय घेतल्यापासून नागरिकांचा सोन्याकडे असलेला ओढा पुन्हा वाढू लागला आहे. भारतात सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. वाढलेल्या मागणीमुळे सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे.


सोमवार ३१ मार्च २०२५ रोजी २४ कॅरेटच्या १० ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याचा दर ९३ हजार ४१५ रुपये ८० पैसे झाला आहे. सोन्याने ९३ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सोन्याच्या दरात होत असलेली वाढ बघता लवकरच सोन्याचा दर एक लाखाचा टप्पा ओलांडेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.



सोन्याच्या बाजारातून आलेल्या रिपोर्टनुसार, सोमवार ३१ मार्च २०२५ रोजी २४ कॅरेटच्या १० ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याचा दर ९३ हजार ४१५ रुपये ८० पैसे तर २२ कॅरेटच्या १० ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याचा दर ८५ हजार ६३१ रुपये १५ पैसे झाला आहे.



सोमवार ३१ मार्च २०२५ रोजी मुंबईतले सोन्याचे दर


२४ कॅरेट सोन्याचा दर




  • १ ग्रॅम - ९३३२ रुपये २० पैसे





  • १० ग्रॅम - ९३३२२ रुपय




२२ कॅरेट सोन्याचा दर



  • १० ग्रॅम - ८५५४५ रुपये १७ पैसे

Comments
Add Comment

वेध निवडणुकीचे : धारावीमध्ये फुलणार भाजपचे कमळ

मुंबई(सचिन धानजी) : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील धारावी विधानसभा क्षेत्रात भाजपचा एकही नगरसेवक निवडून

'अंधेरी - घाटकोपर जोड मार्गावरील उड्डाणपुलाच्‍या बांधकामामुळे बाधित होणा-या पात्र रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा'

महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे प्रत्‍यक्ष पाहणी दौ-यादरम्‍यान निर्देश मुंबई (खास

देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील जैव खाणकामासाठी नवयुग इंजिनिअरींगची निवड

बायोमायनिंग प्रकल्पासाठी तब्बल ३०३५ कोटी रुपये होणार खर्च मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने देवनार

मेट्रो ३ ने दाखवली ‘स्पीड’ची ताकद : पहिल्याच दिवशी ऐतिहासिक प्रतिसाद!

मुंबई : मुंबईकरांनी मेट्रो ३, म्हणजेच अ‍ॅक्वा लाईनला दिलेला प्रतिसाद पाहता हा प्रकल्प खऱ्या अर्थाने यशस्वी ठरत

ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना सुरु

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळाने) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक

डिजिटल क्रांतीद्वारे भारताची जागतिक महासत्तेकडे वाटचाल

मुंबई : डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून भारत आत्मनिर्भरतेकडून जागतिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. या