Maharashtra Breaking News : सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपीना कारागृहात मारहाण

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्येच्या कटात सामील असलेल्या संशयित गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात आल्या. त्यातील संशयित असलेला कृष्णा आंधळे अद्यापही फरार असल्याचे म्हटले जात आहे. पण तुरुंगात असणाऱ्या या आरोपींच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झाले आहे. याबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार वाल्मीक कराड हा सध्या बीड जिल्हा कारागरामध्ये नऊ नंबरच्या बराक मध्ये आहे.त्याचबरोबर हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि इतर आरोपी ही याच जिल्हा कारागृहात असून त्याच कारागृहामध्ये आहेत. परळीतील सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गीते देखील या जिल्हा कारागृहात आहे. आरोपी वाल्मीक कराड आणि महादेव गीते यांचे जुनेच वाद असल्याचे समोर येत आहे. बीड जेलमध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला दोन कैद्यांकडून तुरुंगात मारहाण झाली आहे. महादेव गित्ते, अक्षय आठवलेने मारहाण केल्याचं समजतं आहे.


बीड जिल्हा कारागृहामध्ये दोन टोळ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यानंतर वाद झाला आणि वादाचे रुपांतर मारहाणीत झाल्याचे सांगण्यात येतंय. हा वाद कशामुळे घडला? याबद्दलची माहिती समोर आलेली नाही.

Comments
Add Comment

बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व झायलरियम उभारणार; सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीला वनमंत्र्यांचे ठाम आश्वासन

मुंबई: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी

Parth Pawar: पार्थ पवारांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी घोषणा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय

महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेसह एकूण पाच बँकांना आर्थिक दंड; रिझर्व्ह बँकेचा निर्णय

मुंबई: आरबीआयनं महाराष्ट्रातील विटा मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, विटा या बँकेला दंड केला आहे. या बँकेला ३.१०

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.