Girija Vyas : माजी केंद्रीय मंत्री डॉ. गिरिजा व्यास भाजल्यामुळे गंभीर जखमी

उदयपूर : राजस्थानमधील उदयपूरच्या काँग्रेस नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. गिरिजा व्यास भाजल्यामुळे गंभीर जखमी झाल्या आहेत. घरात पूजा करत असताना ओढणीचा स्पर्श दिव्याला झाला. ओढणीने पेट घेतला आणि जाणीव होण्याआधीच डॉ. गिरिजा व्यास भाजल्यामुळे गंभीर जखमी झाल्या. डॉ. गिरिजा व्यास यांना तातडीने उदयपूर येथील अमेरिकन रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्यांना अहमदाबादला नेण्यात आले.



डॉ. गिरिजा व्यास यांचे बंधू भाई गोपाल शर्मा यांनी घटनेची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. घटना घडली त्यावेळी भाई गोपाल शर्मा फार्म हाऊसवर गेले होते आणि त्यांची बहीण घरीच होती. घरातच पूजा करतेवेळी डॉ. गिरिजा व्यास भाजल्यामुळे गंभीर जखमी झाल्या. घरातील नोकराने डॉ. गिरिजा व्यास यांना रुग्णालयात नेले आणि भाई गोपाल शर्मा यांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच तातडीने परतलेले भाई गोपाल शर्मा यांनी डॉक्टरांनी भेटून डॉ. गिरिजा व्यास यांच्या तब्येतीबाबत माहिती घेतली. नंतर डॉ. गिरिजा व्यास यांना अहमदाबादला नेण्याचा निर्णय झाला. नातलगांनीच परस्पर सहमतीने डॉ. गिरिजा व्यास यांना अहमदाबादला नेले.



कोण आहेत डॉ. गिरिजा व्यास ?

जन्म : ८ जुलै १९४६
१९८५ - उदयपूरच्या काँग्रेस आमदार
१९९१ - उदयपूरच्या काँग्रेस खासदार आणि नरसिंह राव सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण खात्याच्या उपमंत्री
१९९३ - अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष
१९९३ - १९९६ - पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या सदस्य, गृह आणि परराष्ट्र व्यवहार स्थायी समितीच्या सदस्य
१९९६ - दुसऱ्यांदा खासदार
१९९६ - राजभाषा समितीच्या सदस्य, महिला सक्षमीकरण समितीच्या सदस्य, पेट्रोलियम स्थायी समितीच्या सदस्य, गृह मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या सदस्य
१९९९ - तिसऱ्यांदा खासदार
१९९९ - २००० - पेट्रोलियम आणि रसायने समितीच्या सदस्य
२००१ - २००४ - राजस्थान प्रांतिक काँग्रेस समितीच्या अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मीडिया विभागाच्या अध्यक्ष आणि इंडो-ईयू सिव्हिल सोसायटीच्या सदस्य
२००५ - २०११ - राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष
२००८ - राजस्थान विधानसभेच्या आमदार
२०१३ - गृहनिर्माण आणि शहरी दारिद्र्य निर्मूलन मंत्री
Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे