लिव्ह-इन वादातून दुहेरी आत्महत्या; नायगावात प्रेमीयुगुलाचा हृदयद्रावक अंत

वसई : प्रियकराने आत्महत्या केल्याचा धक्का सहन न झाल्याने प्रेयसीनेही आत्महत्या केल्याची घटना नायगाव येथे उघडकीस आली आहे. जितेंद्र वर्मा आणि छाया गुप्ता असे या आत्महत्या केलेल्या जोडप्याचे नाव आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र वर्मा (२४) आणि छाया गुप्ता (१७) या दोघांचे प्रेमसंबध होते. जितेंद्र हा नायगाव पूर्वेच्या कोल्ही गावातील आशानगर मधील अऱविंद चाळीत रहात होता. जितेंद्र एका खासगी कंपनीत कामाला होता. तर अल्पवयीन असलेली छाया शिक्षण घेत होती. जितेंद्रला छायासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये रहायचे होते. त्यासाठी तो तिला आग्रह करत होता. मात्र छाया त्यासाठी तयार नव्हती. ती लहान असल्याने एकत्र राहण्यास तयार नव्हती.



जितेंद्रने छायाला लिव्ह-इनमध्ये राहण्याचा आग्रह केला होता, मात्र ती तयार नव्हती. ती अजून लहान असल्यामुळे एकत्र राहणे तिला योग्य वाटत नव्हते. शनिवारी ती जितेंद्रला भेटायला त्याच्या घरी गेली असता त्यांच्यात यावरून वाद झाला. जितेंद्रला भीती वाटत होती की, जर छाया त्याच्यासोबत राहिली नाही तर ती भविष्यात त्याला सोडून जाईल. या भीतीने ग्रस्त झालेल्या जितेंद्रने तिला सांगितले की, जर तू माझ्यासोबत राहिली नाहीस, तर मी आत्महत्या करीन. छायाने त्याच्या या बोलण्याला फारसे गांभीर्याने घेतले नाही, पण त्याच रात्री जितेंद्रने घरातील लोखंडी अँगलला गळफास घेऊन आपले जीवन संपवले.


या घटनेने छाया पूर्णपणे हादरली. तिला जबरदस्त धक्का बसला होता आणि ती नैराश्यात गेली. कुटुंबियांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिच्या मनातून अपराधीपणाची भावना काही केल्या जात नव्हती. तिला वाटत होते की, जर तिने जितेंद्रचे ऐकलं असतं, तर तो आज जिवंत असता. या भावनांनी तिला इतकं अस्वस्थ केलं की, अखेरीस रविवारी दुपारी तिनेही घरातील लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली.


जितेंद्र आणि छाया या दोघांचे प्रेमसंबंध होते. जितेंद्र हा छायाला लिव्ह इन मध्ये राहण्याचा आग्रह करत होता. परंतु छाया तयार नव्हती. म्हणून शनिवारी जितेंद्रने आत्महत्या केली आणि तो धक्का सहन न झाल्याने रविवारी छायाने देखील आत्महत्या केली, असे नायगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र पाटील यांनी सांगितले.


ही दुहेरी आत्महत्या नायगाव परिसरात हळहळ निर्माण करणारी ठरली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, त्यांच्या मृत्यूमागील मानसिक तणाव आणि कारणांचा शोध घेतला जात आहे.

Comments
Add Comment

मुंबईहून सुटणाऱ्या लोकमान्य टिळक एक्सप्रेसचा अपघात टळला

मुंबई : उत्तर प्रदेशमधील चित्रकूट येथे एक मोठा रेल्वे अपघात टळला. मुंबईहून भागलपूरला जाणारी लोकमान्य टिळक

मुंबईत घर घेण्याचं स्वप्न स्वप्नच रहाणार, ४२६ फ्लॅट्सची सोडत, पण किंमती आवाक्याबाहेर? वाचा A टू Z

मुंबईत ‘घर’ का परवडेना? किंमत ५४ लाखांपासून १ कोटीपर्यंत! मग 'अत्यल्प व अल्प उत्पन्न' गटाचा नेमका अर्थ काय? मुंबई :

मुंबईमध्ये उभारणार आलिशान 'मरिना'! समुद्र पर्यटनाच्या दृष्टीने मुंबई बंदर प्राधिकरणाचे महत्त्वाचे पाऊल

मुंबई: मुंबईला लाभलेल्या अथांग समुद्राचा आणि समुद्रकिनाऱ्यांचा, समुद्राशी निगडित उपक्रमांसाठी वापर

मुंबईत इंडिया मेरिटाईम वीक परिषदेचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : दशकभरात केंद्र सरकारने मेरिटाईम अर्थात सागरी अर्थव्यवस्थेत केलेल्या धोरणात्मक सुधारणांमुळे आज भारत

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेची झुंजार खेळी! १५९ धावांची खेळी करून रहाणेचं मोठं स्टेटमेंट; रोहित-विराटचा दाखला देत टीम इंडियात पुनरागमनाचा ठोकला दावा

मुंबई : रणजी ट्रॉफी २०२५-२६ (Ranji Trophy 2025-26) हंगामाच्या दुसऱ्या राऊंडमध्ये मुंबई संघ (Mumbai Team) छत्तीसगड (Chhattisgarh) विरुद्ध आपला

Kabutarkhana : 'गरज पडल्यास शस्त्र'...कबुतरखान्यांवरील बंदीवरून जैन समाज पुन्हा आक्रमक; जैन मुनींचा थेट 'आमरण उपोषणाचा' इशारा

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे जैन समाज (Jain Community) आक्रमक झाला आहे. या