Santosh Deshmukh : संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? हत्या अनैतिक संबंधातून की दुसऱ्या कारणाने?

Santosh Deshmukh  : संतोष देशमुख प्रकरणात नवा ट्विस्ट


अंजली दमानियांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?


बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांना अडकवण्यासाठी एका महिलेला तयार करण्यात आले होते, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केला आहे. या महिलेची सात-आठ दिवसांपूर्वी हत्या झाल्याची माहिती समोर येत असून, या प्रकरणाने बीडमध्ये खळबळ उडाली आहे.



महिलेचा मृतदेह आणि संशयास्पद हत्येचा तपास


गुरुवार (२७ मार्च २०२५) रोजी बीडमधील कळंब शहरातील द्वारका नगरी वसाहतीत एका महिलेचा मृतदेह घरात सडलेल्या अवस्थेत आढळला. या महिलेने वेगवेगळ्या "मनीषा आकुसकर", "मनीषा बिडवे", "मनीषा बियाणी" आणि "मनीषा गोंदवले" या नावांनी आपली ओळख बदलून विविध ठिकाणी वावर केला होता.



सदर महिला सुदर्शन घुलेच्या संपर्कात होती आणि संतोष देशमुख यांच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी तयार होती, अशी चर्चाही रंगली आहे. मात्र, या दाव्याला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.



हत्या अनैतिक संबंधातून की दुसऱ्या कारणाने?


सदर महिलेला ठार मारण्यामागे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील धागेदोरे नष्ट करण्याचा डाव आहे की तिचा मृत्यू अनैतिक संबंधातून झाला? हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. बीड पोलिसांना ही माहिती उशिराने मिळाली आणि पोलिसांनी घरात प्रवेश केल्यानंतर महिलेचा मृतदेह पूर्णतः सडलेला आढळला.



पोलिस तपास आणि पुढील कारवाई


बीड पोलिसांनी घटनास्थळीच शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार उरकले असून, या हत्येचा सखोल तपास सुरू आहे. शहरात घडलेल्या या घटनेने भय आणि तर्कवितर्कांना उधाण आले असून, पोलिस तपासातूनच आता खरी माहिती समोर येईल, असे बोलले जात आहे.



अंजली दमानियांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?




ही महिला अनेक पुरुषांना अडकवण्याचे काम करायची आणि त्यासाठी ती खाली दिलेल्या नावांचा वापर करायची



१) मनीषा आकुसकर, आडस

२) मनीषा बिडवे, कळंब

३) मनीषा मनोज बियाणी, कळंब

४) मनीषा राम उपाडे, अंबाजोगाई

५) मनीषा संजय गोंदवले, रत्नागिरी
Comments
Add Comment

Rajgad Accident : राजगडाच्या वाटेवर भीषण अपघात! पाबे घाटात मिनी बस २५ फूट दरीत कोसळली; दोन पर्यटकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

पुणे : किल्ले राजगड (Rajgad Fort) येथे पर्यटनासाठी (Tourism) निघालेल्या मुंबईतील अंधेरी येथील पर्यटकांच्या मिनी बसचा (Mini Bus) पुणे

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या