धक्कादायक घटना, एसी कंटेनरमधून ५७ टन गोमांस जप्त

लोणावळा : मुंबई - पुणे एक्सप्रेस वे वर लोणावळ्याजवळील कुसगावच्या हद्दीत दोन एसी कंटेनर पकडण्यात आले. या कंटेनरची तपासणी केली असता त्यातून गोमांसाची वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दोन एसी कंटेनरमधून एकूण ५७ टन गोमांस जप्त केले. या प्रकरणी सिकंदराबाद, हैदराबाद येथील मेसर्स एशियन फूडस मीम अॅग्रो कंपनीच्या मालकासह दोन्ही कंटेनरच्या चालकांच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात बेकायदा गोमांस विक्री आणि वाहतूक करणे तसेच बनावट कागदपत्रांद्वारे गोमांस नसल्याचे दर्शवून फसवणूक करणे हे आरोप ठेवून एफआयआर नोंदवण्यात आली आहे.



हैदराबाद, तेलंगण येथून सुमारे ५७ टन गोमांस न्हावाशेवा पोर्ट, नवी मुंबई येथे विक्रीसाठी नेले जात होते. गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने हा प्रयत्न हाणून पाडला. या प्रकरणात मेसर्स एशियन फूडस मीम अॅग्रो कंपनीचा मालक महंमद सादिक कुरेशी (रा. हैदराबाद, तेलंगण), कंटेनरचालक नदीम कलीम अहमद आणि नसीर महंमद अहमद (दोघेही रा. न्हावाशेवा, नवी मुंबई) यांच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे.



पोलिसांच्या उपस्थितीत पशुवैद्यकीय अधिकारी अनिल परंडवाल यांनी दोन्ही कंटेनरमधील प्रत्येकी दहा असे एकूण २० बॉक्स तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. या नमुन्यांच्या तपासणीचा अहवाल आल्यानंतर कायद्यानुसार पोलीस पुढील कारवाई करणार आहेत. लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करत आहेत.
Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये