धक्कादायक घटना, एसी कंटेनरमधून ५७ टन गोमांस जप्त

  46

लोणावळा : मुंबई - पुणे एक्सप्रेस वे वर लोणावळ्याजवळील कुसगावच्या हद्दीत दोन एसी कंटेनर पकडण्यात आले. या कंटेनरची तपासणी केली असता त्यातून गोमांसाची वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दोन एसी कंटेनरमधून एकूण ५७ टन गोमांस जप्त केले. या प्रकरणी सिकंदराबाद, हैदराबाद येथील मेसर्स एशियन फूडस मीम अॅग्रो कंपनीच्या मालकासह दोन्ही कंटेनरच्या चालकांच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात बेकायदा गोमांस विक्री आणि वाहतूक करणे तसेच बनावट कागदपत्रांद्वारे गोमांस नसल्याचे दर्शवून फसवणूक करणे हे आरोप ठेवून एफआयआर नोंदवण्यात आली आहे.



हैदराबाद, तेलंगण येथून सुमारे ५७ टन गोमांस न्हावाशेवा पोर्ट, नवी मुंबई येथे विक्रीसाठी नेले जात होते. गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने हा प्रयत्न हाणून पाडला. या प्रकरणात मेसर्स एशियन फूडस मीम अॅग्रो कंपनीचा मालक महंमद सादिक कुरेशी (रा. हैदराबाद, तेलंगण), कंटेनरचालक नदीम कलीम अहमद आणि नसीर महंमद अहमद (दोघेही रा. न्हावाशेवा, नवी मुंबई) यांच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे.



पोलिसांच्या उपस्थितीत पशुवैद्यकीय अधिकारी अनिल परंडवाल यांनी दोन्ही कंटेनरमधील प्रत्येकी दहा असे एकूण २० बॉक्स तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. या नमुन्यांच्या तपासणीचा अहवाल आल्यानंतर कायद्यानुसार पोलीस पुढील कारवाई करणार आहेत. लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करत आहेत.
Comments
Add Comment

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या