पंतप्रधान मोदी आज ११ वर्षांनंतर स्मृती मंदिरात जाणार

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (ता.३०) येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देणार आहेत. या भेटीचे विशेष म्हणजे पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी अनेकदा नागपूर आणि परिसरातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावली व दीक्षाभूमीलाही भेट दिली.मात्र, संघ मुख्यालय किंवा रेशीमबाग येथील स्मृतीमंदिराला भेट दिली नव्हती. यावेळी माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर तब्बल ११ वर्षांनी रेशीमबाग येथील स्मृतीमंदिराला भेट देणार आहेत.


भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अतूट नाते आहे. संघाच्या विचारधारेतून अनेक स्वयंसेवक पुढे भाजपमध्ये प्रवेश करीत राजकारणात सक्रिय झाले. आजही भाजपच्या संघटन मंत्रिपदाची जबाबदारी संघाकडूनच दिली जाते. स्वतः नरेंद्र मोदी हे संघाचे एकेकाळी प्रचारक होते. मात्र, पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी विविध धार्मिक आणि सामाजिक संस्थांना भेटी दिल्या असल्या तरी नागपूरच्या संघ मुख्यालयात आले नव्हते. दर तीन वर्षांनी संघाच्या नागपुरातील प्रतिनिधीसभेला गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहतात. विजयादशमी उत्सव आणि तृतीय वर्ष संघ शिक्षावर्गाचा समारोपीय कार्यक्रम हे संघाचे दोन प्रमुख वार्षिक कार्यक्रम आहेत. त्यात विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहतात.



पंतप्रधान झाल्यापासून मोदींनी या संघटनात्मक कार्यक्रमांना आणि संघ मुख्यालयाला दूर ठेवण्याची भूमिका घेतल्याचे दिसत होते. आता, ३० मार्चला स्मृतीमंदिराला त्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी दीक्षाभूमीलाही भेट दिली होती. मात्र, त्यांनी स्मृतीमंदिर स्थळी जाणे टाळले होते. अखेर ३० मार्च रोजी मोदी स्मृतीमंदिराला भेट देणार आहेत. त्यामुळे राजकीय तर्कवितर्कावरून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Comments
Add Comment

छोटी राज्ये चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतात! - वेगळ्या विदर्भाबाबतच्या प्रश्नावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे उत्तर

नागपूर : "छोटी राज्ये ही अधिक चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतात. त्यामुळे याबाबत भाजपचा नेहमीच पुढाकार राहिला

संगमनेर येथील 'पोकळी हिस्से' नोंदीचा प्रश्न मार्गी

नागपूर : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील इंदिरा नगर भागात सर्वे

पुण्यात पोर्शे कार अपघात प्रकरणी पोलिसांविरोधात मोठी कारवाई

पुणे : पुण्याच्या कल्याणीनगर भागात १९ मे २०२४ रोजी पोर्शे कारचा अपघात झाला होता. पोर्शे कारने अश्विनी कोस्टा आणि

नाशिक - पुणे रेल्वे मार्गात बदल, अहिल्यानगरचे नागरिक नाराज

नागपूर : कित्येक वर्षांपासून बहुचर्चित नाशिक - पुणे लोहमार्ग होण्याच्या दिशेने गंभीरपणे हालचाली सुरू झाल्या

दीपावलीला युनेस्कोचा दर्जा; सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सभागृहात केले निवेदन

नागपूर : युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत दीपावलीचा समावेश करण्यात आल्याने भारतीय संस्कृतीचा जगभर

महाराष्ट्रात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांचा गंभीर प्रश्न; नागपूर अधिवेशनात आमदार सोनवणे यांनी वेधले लक्ष, 'राज्य आपत्ती' घोषित करण्याची मागणी

नागपूर : महाराष्ट्रात बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि त्यांच्या मानवी वस्तीत घुसून होणाऱ्या जीवघेण्या