PM MODI : आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विशेष संदेश

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरातील दीक्षाभूमीला दुसऱ्यांदा भेट दिली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.







दीक्षाभूमी येथे नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना बाबासाहेबांच्या सामाजिक समता आणि न्यायाच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, 'बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचतीर्थांपैकी एक असलेल्या नागपूरच्या दीक्षाभूमीवर येण्याचे भाग्य मला लाभले, याचा मला अभिमान वाटतो. या पवित्र स्थळी बाबासाहेबांच्या समता, न्याय आणि सामाजिक ऐक्याच्या विचारांचे प्रतिबिंब दिसते. दीक्षाभूमी गरीब, वंचित आणि गरजूंसाठी समान अधिकार आणि न्यायाची प्रेरणा देणारी आहे. अमृतकालाच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर आपण बाबासाहेबांच्या विचारांवर चालत देशाला नव्या प्रगतीच्या शिखरावर पोहोचवू. एक विकसित आणि समावेशी भारत निर्माण करणे हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल.'



याआधी संघ मुख्यालयात जाऊन पंतप्रधान मोदींनी स्मृती मंदिराला भेट दिली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्थापकांना आदरांजली वाहिली. डॉ. हेडगेवार आणि संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी या दोघांची स्मारके नागपूरच्या रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिरात आहेत. स्मृती मंदिरात आदरांजली वाहून पंतप्रधान मोदींनी तिथल्या अभ्यागत पुस्तिकेत संदेश लिहून स्वाक्षरी केली.

डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्य आधारस्तंभ आणि भारतीय जनता पार्टीचे वैचारिक पालक असल्याचे पंतप्रधान मोदींनी अभ्यागत पुस्तिकेत नमूद केले. अभ्यागत पुस्तिकेत पुढे मोदींनी डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी हे संघाच्या स्वयंसेवकांसाठी उर्जेचा स्रोत असल्याचेही नमूद केले.

 
Comments
Add Comment

महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेसह एकूण पाच बँकांना आर्थिक दंड; रिझर्व्ह बँकेचा निर्णय

मुंबई: आरबीआयनं महाराष्ट्रातील विटा मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, विटा या बँकेला दंड केला आहे. या बँकेला ३.१०

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच