PM MODI : आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विशेष संदेश

  52

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरातील दीक्षाभूमीला दुसऱ्यांदा भेट दिली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.







दीक्षाभूमी येथे नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना बाबासाहेबांच्या सामाजिक समता आणि न्यायाच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, 'बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचतीर्थांपैकी एक असलेल्या नागपूरच्या दीक्षाभूमीवर येण्याचे भाग्य मला लाभले, याचा मला अभिमान वाटतो. या पवित्र स्थळी बाबासाहेबांच्या समता, न्याय आणि सामाजिक ऐक्याच्या विचारांचे प्रतिबिंब दिसते. दीक्षाभूमी गरीब, वंचित आणि गरजूंसाठी समान अधिकार आणि न्यायाची प्रेरणा देणारी आहे. अमृतकालाच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर आपण बाबासाहेबांच्या विचारांवर चालत देशाला नव्या प्रगतीच्या शिखरावर पोहोचवू. एक विकसित आणि समावेशी भारत निर्माण करणे हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल.'



याआधी संघ मुख्यालयात जाऊन पंतप्रधान मोदींनी स्मृती मंदिराला भेट दिली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्थापकांना आदरांजली वाहिली. डॉ. हेडगेवार आणि संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी या दोघांची स्मारके नागपूरच्या रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिरात आहेत. स्मृती मंदिरात आदरांजली वाहून पंतप्रधान मोदींनी तिथल्या अभ्यागत पुस्तिकेत संदेश लिहून स्वाक्षरी केली.

डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्य आधारस्तंभ आणि भारतीय जनता पार्टीचे वैचारिक पालक असल्याचे पंतप्रधान मोदींनी अभ्यागत पुस्तिकेत नमूद केले. अभ्यागत पुस्तिकेत पुढे मोदींनी डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी हे संघाच्या स्वयंसेवकांसाठी उर्जेचा स्रोत असल्याचेही नमूद केले.

 
Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून

जिओमध्ये गुंतवणूक ही माझ्या आयुष्यातली मोठी रिस्क : मुकेश अंबानी

रिलायन्स आता डीप-टेक, अ‍ॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बनण्याच्या मार्गावर मुंबई  : टेलिकॉम क्षेत्रातील