PM MODI : आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विशेष संदेश

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरातील दीक्षाभूमीला दुसऱ्यांदा भेट दिली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.







दीक्षाभूमी येथे नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना बाबासाहेबांच्या सामाजिक समता आणि न्यायाच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, 'बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचतीर्थांपैकी एक असलेल्या नागपूरच्या दीक्षाभूमीवर येण्याचे भाग्य मला लाभले, याचा मला अभिमान वाटतो. या पवित्र स्थळी बाबासाहेबांच्या समता, न्याय आणि सामाजिक ऐक्याच्या विचारांचे प्रतिबिंब दिसते. दीक्षाभूमी गरीब, वंचित आणि गरजूंसाठी समान अधिकार आणि न्यायाची प्रेरणा देणारी आहे. अमृतकालाच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर आपण बाबासाहेबांच्या विचारांवर चालत देशाला नव्या प्रगतीच्या शिखरावर पोहोचवू. एक विकसित आणि समावेशी भारत निर्माण करणे हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल.'



याआधी संघ मुख्यालयात जाऊन पंतप्रधान मोदींनी स्मृती मंदिराला भेट दिली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्थापकांना आदरांजली वाहिली. डॉ. हेडगेवार आणि संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी या दोघांची स्मारके नागपूरच्या रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिरात आहेत. स्मृती मंदिरात आदरांजली वाहून पंतप्रधान मोदींनी तिथल्या अभ्यागत पुस्तिकेत संदेश लिहून स्वाक्षरी केली.

डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्य आधारस्तंभ आणि भारतीय जनता पार्टीचे वैचारिक पालक असल्याचे पंतप्रधान मोदींनी अभ्यागत पुस्तिकेत नमूद केले. अभ्यागत पुस्तिकेत पुढे मोदींनी डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी हे संघाच्या स्वयंसेवकांसाठी उर्जेचा स्रोत असल्याचेही नमूद केले.

 
Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद