Ulhasnagar Metro : आता उल्हासनगरमध्ये धावणार मेट्रो! खडकपाडा ते उल्हासनगर असा मेट्रो-५ चा विस्तार

मुंबई : उल्हासनगरला राहणाऱ्या नागरिकांना मुंबईत येण्यासाठी लोकल ट्रेन शिवाय पर्याय नाही. रस्तेमार्गे मुंबईत येणे खूप वेळखाऊ तर आहेच पण त्याचबरोबर पैसेदेखील अधिक मोजावे लागतात. मात्र आला लवकरच उल्हासनगरच्या नागरिकांचा (Ulhasnagar Metro) प्रवास सोप्पा होणार आहे. कारण लवकरच उल्हासनगरमध्ये मेट्रो धावणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ही माहिती दिली आहे.



ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-५ (Metro 5) मार्गिकेचा विस्तार आता कल्याण ऐवजी उल्हासनगर पर्यंत असणार आहे. खडकपाडा ते उल्हासनगर असा मेट्रोचा विस्तार होणार आहे. २०२४-२५ वर्षासाठीच्या अर्थसंकल्पानुसार मेट्रो 5चा कल्याण-खडकपाडा आणि खडकपाडा-उल्हासनगर अशा ७.७ किमीच्या विस्तारीत मार्गिकेच्या कामासा सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानुसार अर्थसंकल्पात यासंबंधीची तरतूद करुन या विस्तीरीकरणाच्या कार्यवाहीला सुरूवात करण्यात येणार आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गिका २४.९ किमी लांबीची आणि साडेआठ हजार कोटी खर्चाची मार्गिका आहे. या मार्गिकेवर १७ मेट्रो स्थानके असून ठाण्यापासून मेट्रो सुरू होणार आहे. सुरूवातीच्या आराखड्यानुसार मेट्रो ठाण्याला सुरू होऊन कल्याणपर्यंत धावणार होती. मात्र आता मेट्रोचा विस्तार होऊन थेट खडकपाडा ते उल्हासनगर पर्यंत मेट्रो जाणार आहे.


लवकरच या मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात ठाणे-भिवंडी टप्प्याचे काम हाती घेण्यात आली आहे. मेट्रो प्रकल्प मार्ग ५ ठाणे - भिवंडी कल्याणसाठी १,५७९.९९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पात याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता उल्हासनगर, विरार, बदलापूर हा परिसरही मेट्रोने जोडला जाणार आहे. दरम्यान अर्थसंकल्पात मेट्रोसह अनेक पायाभूत प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करत एमएमआरडीएने एमएमआरच्या भविष्याचा आराखडा मांडला असल्याची प्रतिक्रिया यानिमित्ताने महानगर आयुक्त डाॅ.संजय मुखर्जी यांनी दिली.

Comments
Add Comment

स्वतंत्र न राहता दोन्ही राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष येणार एकत्र

गट स्थापन करत आपला नेमणार गटनेता, विविध समित्यांमध्ये मिळवणार स्थान मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत

Dahisar Bhayandar Metro 9 Line Railway : दहिसर-भाईंदरकरांची प्रतीक्षा संपली! मेट्रो-९ ला 'ग्रीन सिग्नल', १० स्थानके, १३ किमी मार्गाचा रुट; फेब्रुवारीत धावणार पहिली ट्रेन

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत

महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुका: मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा पुन्हा एकदा पुढे,कधी आहेत?

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुळीमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या पुढे ढकलण्यात

मुख्यमंत्र्यांनी केली तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा; एक लाख कोटींची गुंतवणूक येणार

मुंबई : स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या

बारावी–दहावी परीक्षेआधी महाराष्ट्र बोर्डाचा निर्णय, नियम, मार्गदर्शन, प्रेरणा सर्व काही यूट्यूब चॅनेलवर

मुंबई : बारावी आणि दहावी परीक्षांच्या आधी, महाराष्ट्र बोर्डाने विद्यार्थी, शाळा आणि परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांना

टीईटीच्या निकालात यंदा ८.५३ टक्के उमेदवार पात्र

पावणेचार लाख उमेदवारांनी दिली परीक्षा उत्तीर्ण बंधनकारक केल्याने वाढली संख्या मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या