Governor Haribhau Bagde : हेलिकॉप्टर अपघातातून राज्यपाल हरिभाऊ बागडे थोडक्यात बचावले

जयपूर : राजस्थानचे राज्यपाल आणि महाराष्ट्रातील भाजपचे नेते हरिभाऊ बागडे यांच्या हेलिकॉप्टरला शनिवारी(दि.३०)अपघात झाला. मात्र अपघातामध्ये ते थोडक्यात बचावले आहे. राजस्थानमधील पाली येथून हरिभाऊ बागडे यांचं हेलिकॉप्टर उड्डाण करत असताना ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.




मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक स्फोट झाला. ही घटना शनिवारी (दि. ३०) सायंकाळच्या सुमरास घडली.हरिभाऊ बागडे हे राजस्थानवरून पाली येथील एका कार्यक्रमासाठी आले होते. हा कार्यक्रम झाल्यानंतर ते जयपूरला निघाले होते त्याचवेळी ही घटना घडली.पाली येथून हेलिकॉप्टरने उड्डान घेत असताना हेलिकॉप्टरच्या मागच्या भागात स्फोट झाला. स्फोट होताच धूर निघू लागला. स्फोट झाल्याचे लक्षात घेता पायलटने तात्काळ हेलिकॉप्टरचे सुरक्षित लँडिंग केले. त्यामुळे सुदैवाने या अपघातामध्ये पायलटसह हरिभाऊ बागडे थोडक्यात बचावले.

या अपघाताचा व्हिडीओ आता समोर आला असून तो व्हायरल होत आहे. या घटनेमुळे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या सुरक्षेतील मोठी चूक आढळून आल्याचे सांगितले जात आहे. राज्यपाल बागडेंची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आपत्कालीन प्रोटोकॉल लागू केला जाऊ शकतो. सध्या या अपघाताची चर्चा होत आहे.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा