Railway Accident : बंगळुरू - कामाख्या एक्सप्रेस घसरली, रुळावरुन ११ डबे उतरले

नवी दिल्ली : ओडिशातील कटक जिल्ह्यात बंगळुरू - कामाख्या एसी सुपरफास्ट एक्सप्रेसचे ११ डबे रुळावरुन खाली घसरले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आणि सात जण जखमी झाले. मदतकार्य सुरू आहे. अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले आहेत.



जखमींवर एससीबी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.



खुर्दा रोड विभागांतर्गत कटक - नारगुंडी रेल्वे विभागातील नारगुंडी स्थानकाजवळ रविवार ३० मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजून ५४ मिनिटांनी अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.



प्रशासनाने पूर्व विभागातील रेल्वे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचे काम हाती घेतले आहे. तंत्रज्ञांच्या मदतीने रुळ दुरुस्त करुन रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हेल्पलाईन क्रमांक : ८४५५८८५९९९ आणि ८९९११२४२३८
Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च