Tarak Mehta Ka Ooltah Chashma : ठरलं तर! तारक मेहता का उल्टा चष्मा मध्ये 'दयाबेन' ची एन्ट्री होणार!

  48

मुंबई : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची मनोरंजन क्षेत्रातील आवडती मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'. ही मालिका गेली १६ वर्ष प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आली आहे. या मालिकेतील पात्रांनी प्रेक्षकांचं मन अल्पावधीतच जिंकलं. मात्र या मालिकेतील 'दयाबेन' म्हणजेच दिशा वाकानी काही कारणास्तव मालिकेत दिसलीच नाही. मात्र आता 'दयाबेन' पुन्हा मालिकेत दिसणार आहे.




मिळालेल्या माहितीनुसार, 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील दिशा वाकानी हिने मालिका सोडल्यानंतर मध्यंतरी या मालिकेचे दिग्दर्शक असित मोदीने दिशा वाकानी पुन्हा दयाबेन म्हणून परत काम करणार असल्याचं म्हटलं होत. मात्र त्याच्या प्रयत्नांना अपयश आल्याने अजूनही या मालिकेत दयाबेनची जागा कोणीही घेतलेली नाही. त्यासाठी असित मोदीने अनेक महिला कलाकारांचे ऑडिशन घेतले परंतु दयाबेनच्या पात्राला न्याय देणारी कलाकार त्यांना सापडतच नव्हती. मात्र आता दिशा वाकानीच्या जागी दयाबेन पात्र साकारणारी नवीन कलाकार येणार असल्याची चर्चा सुरु आहे. या अभिनेत्रीची अद्यापही ओळख उघड झाली नसून गेल्या एका आठवड्यापासून तिचं टीमसोबत शूटिंग सुरु आहे. दरम्यान आता दयाबेनच्या पात्र साकारणारी अभिनेत्री नेमकी कोण असेल याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

Comments
Add Comment

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 'येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच थाटात संपन्न...

मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच

डोळे सुजलेल्या अवस्थेत चिन्मयी सुमितने सांगितलं हिंदी सक्ती विरोधात सहभागी न होण्याचं कारण..

हिंदी भाषा सक्तीचा जीआर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी काढला. या जीआरनुसार मराठी भाषा इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत

झी टॉकीजचा अनोखा उपक्रम..विठोबा रखुमाईसाठी हाताने विणले जात आहे वस्त्र..

झी टॉकीजचा 'हँडलूम कॅन्टर' यंदाच्या वारीत सज्ज झाला आहे. सध्या फलटण फाट्याजवळ विठोबासाठी भक्तीचं वस्त्र विणलं

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची झी मराठीच्या 'कमळी' मालिकेत एन्ट्री

मुंबई : अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने तिच्या अभिनय

Phir Hera Pheri 3 : ये बाबुराव का स्टाइल है... अखेर ‘बाबू भैय्या’चं 'Phir Hera Pheri 3' मध्ये दणक्यात पुनरागमन!

अक्षय कुमार-प्रियदर्शन बरोबरच्या वादावर पडदा मुंबई : परेश रावल यांनी हेरा फेरी ३ चा वाद संपुष्टात आणत या

भारतीय रेल्वे अपघातांवर अभिनेते मिलिंद गवळींची उद्विग्न प्रतिक्रिया: "पाकिस्तान-बांग्लादेशपेक्षा बरी, पण..."

मुंबई: लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी यांनी मुंबईतील वाढत्या रेल्वे अपघातांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सोशल