Gudi Padwa 2025 : बांबूंच्या काठ्यांचे वाढले दर

खोपोली : मराठी नववर्ष गुढी पाडवा तोंडावर येऊन ठेपले आहे. नव वर्ष संवत्सर फल काय मिळणार, हे नुतन पंचांगात नमुद केले आहेच महाराष्ट्रात गुढी उभारून या नववर्षाचे स्वागत करण्यात येते. मात्र, आता या गुढीला लागणाऱ्या नव्या बांबूंची किंमत दुप्पटीने वाढली आहे हेही तितकेच खरे आहे. शहरी भागात तर बांबूंची काठी मिळणे दुरापास्त झाले आहे. बव्हंशी बांबूकाठी ग्रामीण भागातून मिळते. पण वाढतं प्रदूषण, माकडांचा उपद्रव आणि काटा येणे आदी कारणांमुळे बांबूचे उत्पादन घटत चालले आहे.



कोकणात बांबूला मानगा, चिवा आदी नावानेही ओळखले जाते. हा बांबू कुंपणाच्या कडेने उगवतो. काही ठिकाणी याची शास्त्र शुद्ध लागवड केली जाते मात्र वाढत्या महागाईमुळे, याची लागवड करताना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागते. मिरगानंतर कोंब येतात, त्यावेळी ते कोंब माकड- हत्ती फस्त करतात. याचा परिणाम सलग वाढीवर होतो. बांबूला बुरूड कामातही मागणी असते रेती व्यवसाय, मांडव स्टेज डेकोरेशन, काजू-आंबा काढण्याची काठी आदीमुळे बांबूची उचल ठेकेदार मार्फत होते.


सध्याच्या वाढत्या महागाई मुळे बांबूंच्या किमतीवर परिणाम होत आहे त्यात बांबूंची बेटे हवामान व नैसर्गिक कारणांमुळे नष्ट होत आहेत. या नववर्षाच्या स्वागतासाठी गुढीला नवीन बांबू उभारण्याची काही ठिकाणी पद्धत आहे, तर काही ठिकाणी पुनर्वापर होतो मात्र, वरील सर्व कारणांमुळे, बांबूंचे दर हे गगगनाला भिडलेले दिसत आहेत.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा कांस्य पुतळा

नवी मुंबई विमानतळ : महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय

Vladimir Putin : भारतावर निर्बंधांचा परिणाम होणार नाही, पुतिन यांचा मोदींवर विश्वास

मॉस्को : ‘भारत आणि रशिया यांच्यातील सहकार्य आणि व्यापारी भागीदारी अत्यंत मजबूत आहे. कोणत्याही देशाने दिलेल्या

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलचं नवं गाणं होतंय तुफान व्हायरल, भाऊ कदम म्हणतोय 'हिल हिल पोरी हिला’

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलला महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही असं फार क्वचित वेळेत दिसून येईल. सबसे कातील गौतमी पाटील अशी

Chalisgaon : चाळीसगाव महावितरणाचा अजब कारभार: अधिकारी 'मस्तवाल', जनता 'बेहाल'!

Chalisgaon :  चाळीसगाव शहरासह परिसरात महावितरण विभागाचा मनमानी कारभार शिगेला पोहोचला असून, सध्या 'त्रस्त नागरिक आणि

BCCI SELECTION : BCCI कडून दोन मोठ्या स्पर्धांसाठी भारतीय संघांची घोषणा; श्रेयस अय्यरकडे नेतृत्व, तिलक वर्मा उपकर्णधार

MUMBAI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी इंग्लंड दौरा 2026 आणि आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (जपान) यासाठी भारतीय पुरुष

BCCI SQUAD SELECTION : भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीसाठी बीसीसीआयची बैठक सुरू; श्रेयस अय्यरकडे सोपवली जाणार धुरा?

BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) वरिष्ठ निवड समिती आज मुंबईतील मुख्यालयात महत्त्वाची बैठक घेत आहे. या बैठकीत