पंच नद्यांचे वरदान, तरीही वाडा तालुका तहानलेला

वाडा : तालुक्यात दोनशे खेडी व दोनशेहून अधिक पाडे असून ८६ ग्रामपंचायती आहेत. तालुक्याची लोकसंख्या दहा लाखांच्या आसपास आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात पाणी समस्येचे निराकरण होत नसल्याने तालुक्यात उज्जैनी, आखाडा, भगत पाडा, वडवली, विरे, सातरोंडे, साखरशेत, घायपात पाडा, भोकरपाडा, वंगण पाडा, नांदणी, अंबरभुई, गाय गोठा, कोशिमशेत या गावपाड्यांमध्ये पाणी समस्येने उग्ररूप धारण केले आहे.


तालुक्याला बारमाही मुबलक पाणी असणाऱ्या वैतरणा, तानसा, पिंजाळ, गार गाई व देहर्जे या पाच नद्यांचे वरदान लाभले आहे. मात्र लोकप्रतिनिधी,अधिकाऱ्यांनी मनावर घेतल्यास वैतरणा नदीचे जे पाणी कोकाकोला कंपनीला नेता येते, ते पाणी पुरेसा निधी उपलब्ध केला, तर जनतेला का मिळू शकणार नाही, असा सवाल नागरिक करीत आहेत.


तालुक्यातील दुर्गम भाग मानला जाणाऱ्या सागमाल, तिरमाल, मुह माळ, घोड सागरे, फणस पाडा या गाव पाड्यातील महिलांना भर उन्हात हंडा घेऊन पायपीट करावी लागते. वास्तविक आदिवासींना पाणी वेळेत आणि मुबलक मिळावे, यासाठी जलजीवन मिशन सारख्या योजना कोट्यावधी रुपये ओतून राबवल्या जात आहेत. मात्र त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम, त्यात ठेकेदार व अधिकाऱ्यांनी मलिदा खाऊन अर्धवट केलेली कामे, यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच दुर्गम भागात रस्ते अभावी टँकरने पाणीपुरवठा करणे अवघड आहे.



या नद्यांवर धरण किंवा बंधारा बांधण्याची गरज आहे. या बंधाऱ्यातून वाड्यासह विक्रमगड तालुक्याला देखील पाणीपुरवठा होईल. यासाठी नद्यांमधून जाणारे पाणी अडवण्याची गरज आहे. तालुक्यातील अनेक गाव-पाडे पाणी टंचाईला तोंड देत असून अधिकारी तालुक्यात पाणीटंचाई नाही,अशा खोट्या फुशारक्या मारत आहेत. तालुक्यातील अनेक गावपाड्यातील महिलांना आत्तापासूनच पाण्यासाठी रात्री जागरण करावे लागते. तर काही गावात हंडाभर पाण्यासाठी आळीपाळीने पाणी भरावे लागते.


या नद्यांवर एक तरी मोठा बंधारा बांधण्यात आला, तर तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटून शेतीला देखील पाणी मिळेल मात्र लोकप्रतिनिधी उत्सुक नसल्याने पाच नद्यांचे वरदान लाभूनही वाडा तालुका तहानलेलाच आहे.

Comments
Add Comment

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या मनात नेमकं चाललंय काय? निवृत्ती की राजकीय खेळी?

शिंदे गटाच्या आमदाराच्या निर्णयामागे कुटुंबातील 'नवे नेतृत्व' आणण्याची खेळी? मुंबई : राज्याचे समाजकल्याण

मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीवरून भांडण! नागपूरचे पोस्टमास्टर जनरलपद नेमके कुणाकडे?

एकीने दुसरीच्या अंगावर पाणी ओतलं, चिमटाही काढला नागपूर : नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या

फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, प्रशांतच्या बहिणीचा मोठा खुलासा

सातारा : साताऱ्यातील फलटण येथे महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळालं आहे. या

फलटणमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या, निलंबित PSI बदनेचा शोध सुरू

सातारा : सातारा जिल्हातील फलटण मधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पोलिसांना २४ तासांच्या आत आरोपी प्रशांत