पंच नद्यांचे वरदान, तरीही वाडा तालुका तहानलेला

वाडा : तालुक्यात दोनशे खेडी व दोनशेहून अधिक पाडे असून ८६ ग्रामपंचायती आहेत. तालुक्याची लोकसंख्या दहा लाखांच्या आसपास आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात पाणी समस्येचे निराकरण होत नसल्याने तालुक्यात उज्जैनी, आखाडा, भगत पाडा, वडवली, विरे, सातरोंडे, साखरशेत, घायपात पाडा, भोकरपाडा, वंगण पाडा, नांदणी, अंबरभुई, गाय गोठा, कोशिमशेत या गावपाड्यांमध्ये पाणी समस्येने उग्ररूप धारण केले आहे.


तालुक्याला बारमाही मुबलक पाणी असणाऱ्या वैतरणा, तानसा, पिंजाळ, गार गाई व देहर्जे या पाच नद्यांचे वरदान लाभले आहे. मात्र लोकप्रतिनिधी,अधिकाऱ्यांनी मनावर घेतल्यास वैतरणा नदीचे जे पाणी कोकाकोला कंपनीला नेता येते, ते पाणी पुरेसा निधी उपलब्ध केला, तर जनतेला का मिळू शकणार नाही, असा सवाल नागरिक करीत आहेत.


तालुक्यातील दुर्गम भाग मानला जाणाऱ्या सागमाल, तिरमाल, मुह माळ, घोड सागरे, फणस पाडा या गाव पाड्यातील महिलांना भर उन्हात हंडा घेऊन पायपीट करावी लागते. वास्तविक आदिवासींना पाणी वेळेत आणि मुबलक मिळावे, यासाठी जलजीवन मिशन सारख्या योजना कोट्यावधी रुपये ओतून राबवल्या जात आहेत. मात्र त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम, त्यात ठेकेदार व अधिकाऱ्यांनी मलिदा खाऊन अर्धवट केलेली कामे, यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच दुर्गम भागात रस्ते अभावी टँकरने पाणीपुरवठा करणे अवघड आहे.



या नद्यांवर धरण किंवा बंधारा बांधण्याची गरज आहे. या बंधाऱ्यातून वाड्यासह विक्रमगड तालुक्याला देखील पाणीपुरवठा होईल. यासाठी नद्यांमधून जाणारे पाणी अडवण्याची गरज आहे. तालुक्यातील अनेक गाव-पाडे पाणी टंचाईला तोंड देत असून अधिकारी तालुक्यात पाणीटंचाई नाही,अशा खोट्या फुशारक्या मारत आहेत. तालुक्यातील अनेक गावपाड्यातील महिलांना आत्तापासूनच पाण्यासाठी रात्री जागरण करावे लागते. तर काही गावात हंडाभर पाण्यासाठी आळीपाळीने पाणी भरावे लागते.


या नद्यांवर एक तरी मोठा बंधारा बांधण्यात आला, तर तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटून शेतीला देखील पाणी मिळेल मात्र लोकप्रतिनिधी उत्सुक नसल्याने पाच नद्यांचे वरदान लाभूनही वाडा तालुका तहानलेलाच आहे.

Comments
Add Comment

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे