पंच नद्यांचे वरदान, तरीही वाडा तालुका तहानलेला

वाडा : तालुक्यात दोनशे खेडी व दोनशेहून अधिक पाडे असून ८६ ग्रामपंचायती आहेत. तालुक्याची लोकसंख्या दहा लाखांच्या आसपास आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात पाणी समस्येचे निराकरण होत नसल्याने तालुक्यात उज्जैनी, आखाडा, भगत पाडा, वडवली, विरे, सातरोंडे, साखरशेत, घायपात पाडा, भोकरपाडा, वंगण पाडा, नांदणी, अंबरभुई, गाय गोठा, कोशिमशेत या गावपाड्यांमध्ये पाणी समस्येने उग्ररूप धारण केले आहे.


तालुक्याला बारमाही मुबलक पाणी असणाऱ्या वैतरणा, तानसा, पिंजाळ, गार गाई व देहर्जे या पाच नद्यांचे वरदान लाभले आहे. मात्र लोकप्रतिनिधी,अधिकाऱ्यांनी मनावर घेतल्यास वैतरणा नदीचे जे पाणी कोकाकोला कंपनीला नेता येते, ते पाणी पुरेसा निधी उपलब्ध केला, तर जनतेला का मिळू शकणार नाही, असा सवाल नागरिक करीत आहेत.


तालुक्यातील दुर्गम भाग मानला जाणाऱ्या सागमाल, तिरमाल, मुह माळ, घोड सागरे, फणस पाडा या गाव पाड्यातील महिलांना भर उन्हात हंडा घेऊन पायपीट करावी लागते. वास्तविक आदिवासींना पाणी वेळेत आणि मुबलक मिळावे, यासाठी जलजीवन मिशन सारख्या योजना कोट्यावधी रुपये ओतून राबवल्या जात आहेत. मात्र त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम, त्यात ठेकेदार व अधिकाऱ्यांनी मलिदा खाऊन अर्धवट केलेली कामे, यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच दुर्गम भागात रस्ते अभावी टँकरने पाणीपुरवठा करणे अवघड आहे.



या नद्यांवर धरण किंवा बंधारा बांधण्याची गरज आहे. या बंधाऱ्यातून वाड्यासह विक्रमगड तालुक्याला देखील पाणीपुरवठा होईल. यासाठी नद्यांमधून जाणारे पाणी अडवण्याची गरज आहे. तालुक्यातील अनेक गाव-पाडे पाणी टंचाईला तोंड देत असून अधिकारी तालुक्यात पाणीटंचाई नाही,अशा खोट्या फुशारक्या मारत आहेत. तालुक्यातील अनेक गावपाड्यातील महिलांना आत्तापासूनच पाण्यासाठी रात्री जागरण करावे लागते. तर काही गावात हंडाभर पाण्यासाठी आळीपाळीने पाणी भरावे लागते.


या नद्यांवर एक तरी मोठा बंधारा बांधण्यात आला, तर तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटून शेतीला देखील पाणी मिळेल मात्र लोकप्रतिनिधी उत्सुक नसल्याने पाच नद्यांचे वरदान लाभूनही वाडा तालुका तहानलेलाच आहे.

Comments
Add Comment

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी