Attack on Hindu : पश्चिम बंगालमधील माल्दामध्ये हिंदू संकटात, विरोधी पक्षनेत्याचे राज्यपालांना पत्र

माल्दा : पश्चिम बंगालमधील माल्दामध्ये हिंदू संकटात आहेत. हिंदूंच्या मालमत्तांना लक्ष्य करुन हल्ले करणे, हिंदूंना घाबरवणे असे प्रकार सुरू आहेत. प्रामुख्याने हिंदूंच्या वाहनांना आणि दुकानांना लक्ष्य केले जात आहे. हिंदूंच्या रक्षणासाठी तातडीने माल्दामध्ये केंद्रीय सुरक्षा पथकांना बोलवावे, अशी मागणी करणारे पत्र पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी राज्यपाल सी. व्ही. आनंदा बोस यांना लिहिले आहे. माल्दा जिल्ह्यातील मोथाबारीमध्ये हिंदूंना लक्ष्य करण्याचे प्रमाण जास्त आहे. यामुळे मोथाबारीमध्ये तातडीने केंद्रीय सुरक्षा पथकांना नियुक्त करावे, अशीही मागणी विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी राज्यपाल सी. व्ही. आनंदा बोस यांच्याकडे केली आहे. राज्यपालांनी केंद्रीय सुरक्षा पथके नियुक्त करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारला आवश्यक ते निर्देश द्यावे; अशी मागणी विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी केली आहे.



याआधी केंद्रीय शिक्षणमंत्री आणि पश्चिम बंगाल भाजपाचे अध्यक्ष सुकांत मुजुमदार यांनी गुरुवारी संध्याकाळी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. व्हिडीओ पोस्ट करुन मालदा जिल्ह्यातील मोथाबारी येथे हिंदूंवर हल्ला झाल्याचे सुकांत मुजुमदार म्हणाले. या घटनेनंतर लगेच दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी राज्यपालांना पत्र लिहिले. ममता बॅनर्जींचे सरकार मुसलमानांचे लांगुलचालन करण्यात मग्न आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी केला.



पश्चिम बंगालचे पोलीस ममता बॅनर्जी सरकारचे आदेश पाळत असल्यामुळे मुसलमानांनी काहीही केले तरी मूग गिळून गप्प बसतात. हिंदूंवर मुसलमान हल्ले करत असले तरी पोलीस हे हल्ले थोपवण्यासाठी ठोस उपाय करताना दिसत नाहीत. पश्चिम बंगाल सरकारचे वर्तन हिंदूंसाठी धोकादायक आणि राज्यातील कायदा - सुव्यवस्था बिघडवणारे असे आहे, अशी तक्रार सुवेंदू अधिकारी यांनी केली.
Comments
Add Comment

January : भारतीय मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची गरुडझेप; जानेवारीत 'PMI' मध्ये सुधारणा, पण उद्योजकांच्या मनात धाकधूक!

भारतीय अर्थव्यवस्था आणि उत्पादन क्षेत्रासाठी जानेवारी २०२६ हा महिना संमिश्र पण काहीसा दिलासादायक ठरला आहे.

Gold-Silver Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं- चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या नवे दर

मुंबई: रविवार १ फेब्रुवारी रोजी भारताचा अर्थसंकल्प जाहीर झाला. यावेळी सोने आणि चांदीबाबत कोणतीही मोठी थेट घोषणा

‘आशियामध्ये शांततेसाठी अरब राष्ट्राची भूमिका कौतुकास्पद’

नवी दिल्ली : अरब देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी

भारताचे आतापर्यंतचे सर्वात मोठे संरक्षण बजेट

नवी दिल्ली : यंदाच्या बजेटमध्ये संरक्षण विभागासाठी ७.८ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संरक्षणासाठी

भूतान, नेपाळ, श्रीलंका याविश्वासू मित्रांसाठी मदतीचा हात, संबंधातील कडवटपणामुळे बांगलादेशला आर्थिक झटका

नवी दिल्ली  : केंद्रातील मोदी सरकारने २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना आपल्या परराष्ट्र धोरणाचे

इतर देशांच्या तुलनेत किती मोठे आहे देशाचे संरक्षण बजेट

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत बजेट सादर केले. यंदाच्या बजेटमध्ये भारताच्या