Bank Holiday : बँकेची ईदची सुट्टी रद्द; ३१ नव्हे 'या' तारखेला राहणार बँका बंद!

मुंबई : नवीन महिन्याला सुरुवात होताच आरबीआयकडून (RBI) बँकींग सुट्ट्यांची यादी जाहीर केली जाते. त्यानुसार ३१ मार्च रोजी रमजान ईद निमित्त (Eid Holiday) महाराष्ट्रात आणि भारतातील बहुतांश राज्यात सुट्टी देण्यात आली होती मात्र आता आरबीआयने नवीन निर्देश जारी करत त्या दिवशी सुट्टी (Bank Holiday) रद्द केली आहे. त्यामुळे आता रमजानच्या दिवशी सर्व बँकिंग सेवा सुरु राहणार आहेत. जाणून घ्या यामागचं नेमकं कारण काय.



येत्या १ एप्रिल २०२५ पासून नवं आर्थिक वर्षाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक व्यवसाय संस्थेत बदल होत राहतात. आरबीआयकडून (RBI) देखील नवं वर्षात देशभरातील सर्व बँकिगच्या नियमावलीत बदल केले जातात. दरम्यान, ३१ मार्च आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्यामुळे आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षांशी निगडीत सर्व आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी बँकेच्या कर्मचाऱ्यांना कामावर यावे लागणार आहे. दरम्यान, आज आणि उद्या जम्मू काश्मीरमधील बँका बंद राहणार आहेत. २९ मार्च शनिवारी बँका बंद असतील अस अनेकांना वाटत आहे. मात्र, २९ तारखेला पाचवा शनिवार असल्याने बँका खुल्या राहणार आहेत.


त्याचबरोबर. रिझर्व्ह बँकेने (RBI) सुरूवातीच्या काळात ३१ मार्चला बँक हॉलिडे जाहिर केला होता, परंतु २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने आणि वर्षातील आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याची अंतिम तारीख असल्याने ही सुट्टी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ही सुट्टी १ एप्रिल रोजी बँकांना सुट्टी देण्यात येणार आहे.



बँक सुट्ट्यांच्या दिवशी कोणत्या बँकिंग सेवा राहणार सुरु?


बँक सुट्ट्यांच्या (Bank Holiday) दिवशी ग्राहक वर्षभरासाठी डिजिटल किंवा नेट बँकिंग सेवा वापरू शकतात. तसेच सर्व बँक वेबसाइट्स, बँकिंग अ‍ॅप्स, UPI आणि ATM सेवा वर्षभर सक्रिय राहतील. या दिवशी तुम्ही डिजिटल पद्धतीने फिक्स्ड डिपॉझिट किंवा रिकरिंग डिपॉझिट देखील सुरू करू शकता.

Comments
Add Comment

ICEYE भारतात उपग्रह उत्पादन सुरू करणार

नवी दिल्ली : अंतराळ-आधारित गुप्तचर क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी 'आय-साय' (ICEYE) पुढील एका वर्षात भारतात आपले

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या