देशमुख हत्येचा नवा अँगल, सुग्रीव कराडचे नाव आले समोर; चाटे आणि केदारच्या जबाबामुळे वाढला गोंधळ

बीड : महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात जयराम चाटे आणि महेश केदार या दोघांनी पोलिसांना दिलेल्या जबाबामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुग्रीव कराड हे एक नवे नाव समोर आले आहे.



आवादा कंपनीकडे मागण्यात आलेल्या खंडणीला विरोध केल्यामुळे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे आतापर्यंतच्या तपासातून उघड झाले आहे. पण या प्रकरणात अटकेत असलेल्यांपैकी जयराम चाटे आणि महेश केदार या दोन आरोपींनी पोलिसांना दिलेल्या जबाबामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. चाटे आणि केदारने दिलेल्या जबाबातील सुग्रीव कराड कोण आहे ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.



संतोष देशमुख हत्या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वासू वाल्मिक कराड मास्टरमाईंड असल्याचे आतापर्यंत सर्व समजत होते. पण चाटे आणि केदारने दिलेल्या जबाबात सुग्रीव कराड हे वेगळेच नाव पुढे आले आहे. सुग्रीव कराडच्या सांगण्यावरुन सरपंच संतोष देशमुख आणि काही ग्रामस्थांनी सुदर्शन घुलेला मारहाण केली होती. त्याचा बदला म्हणून घुले आणि त्याच्या साथीदारांनी देशमुख यांना मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला, असं जयराम चाटे आणि महेश केदारने पोलिसांना सांगितले. चाटे आणि केदार यांच्या जबाबात खंडणीचा उल्लेख कुठेही आलेला नाही.



आवादा कंपनीच्या आवारात सुदर्शन घुलेला मारहाण झाली होती. सरपंच देशमुख आणि ग्रामस्थांनी सुग्रीव कराडच्या सांगण्यावरुन घुलेला मारहाण केली. या प्रकारामुळे घुले आणि वाल्मिक अण्णा कराडचा अपमान झाल्याचे फरार आरोपी कृष्णा आंधळेने आम्हाला सांगितले. घुले आणि वाल्मिक अण्णा कराडच्या अपमानाचा बदला घ्यावा लागेल, असे आंधळे आम्हाला म्हणाला होता; असे चाटे आणि केदार यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले.

घुलेला झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला; असे चाटे आणि केदार यांनी पोलिसांना सांगितले. त्यांच्या जबाबामुळे या प्रकरणात सुग्रीव कराड हे नवे नाव पुढे आले आहे. आता हा सुग्रीव कराड असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: हवामानात मोठा बदल! उकाडा वाढला, पाऊस गायब; आज तुमच्या भागात सरी कोसळणार की नाही?

मुंबई :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि