प्रशांत कोरटकरला दोन दिवसांची पोलीस कोठडी

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याप्रकरणी अटक केलेल्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाने आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. सध्या पोलीस कोठडीतच असलेल्या प्रशांत कोरटकरचा पोलिसांकडचा ताबा आणखी दोन दिवसांनी वाढला आहे.



अटक केल्यानंतर प्रशांत कोरटकरला पोलीस कोठडीची मागणी करण्यासाठी पहिल्यांदा पोलिसांनी कोल्हापूर न्यायालयात हजर केले होते. त्या दिवशी एका छत्रपती शिवाजी महाराजप्रेमी व्यक्तीने कोरटकर कोल्हापुरी चप्पल उगारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. तर यावेळी न्यायालयाच्या आवारात एका वकिलानेच कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराजांची बदनामी करतोस का, असा सवाल करत अमित भोसले नावाच्या वकिलाने कोरटकरवर झडप घातली. पोलिसांनी त्यांना दूर केले. यानंतर कोरटकर जवळ आणखी पोलीस उभे राहिले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.



छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्यानंतर फरार झालेल्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातील एका काँग्रेस पदाधिकार्‍याच्या घरातून अटक केली. यानंतर कोरटकरला कोल्हापूरमध्ये आणण्यात आले. सध्या कोरटकर पोलीस कोठडीत आहे.
Comments
Add Comment

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे