प्रहार    

Electricity Bill Center : सुट्टीच्या दिवशीही वीजबिल केंद्र सुरू राहणार!

  54

Electricity Bill Center : सुट्टीच्या दिवशीही वीजबिल केंद्र सुरू राहणार!

ठाणे : मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार आहेत. त्यानुसार कल्याण व भांडुप परिमंडलांतर्गत सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवार, रविवार आणि सोमवारी (२९ ते ३१ मार्च) या सुट्टीच्या दिवशी सुरु राहतील. उपलब्ध सुविधेचा लाभ घेऊन वीज ग्राहकांनी आपल्या चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
वीजबिल थकबाकी कमी करण्यासाठी थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम कल्याण व भांडुप परिमंडलात सुरू आहे. सुट्टीच्या दिवशीही ही मोहीम सुरू राहणार असून संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकबाकीचा त्वरित भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. अधिकृत वीजबिल भरणा केंद्रासह महावितरणचे मोबाईल ॲप, www.mahadiscom.in हे संकेतस्थळ तसेच विविध पेमेंट वॉलेटचा उपयोग करून घरबसल्या वीजबिलाचा ऑनलाईन भरणा करण्याची सुविधाही ग्राहकांना उपलब्ध आहे. ग्राहकांनी अखंडित वीज सेवेसाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करावा.



सोबतच कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांना केवळ मूळ थकबाकीच्या रकमेचा एकरकमी किंवा सहा हप्त्यांत भरणा करून थकबाकीमुक्ती व पुनर्जोडणीची संधी देणाऱ्या अभय योजनेची मुदत ३१ मार्चला संपत आहे. मुदत संपण्यापूर्वी संबंधित ग्राहकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Comments
Add Comment

कोकणात राष्ट्रवादीला धक्का प्रशांत यादव भाजपमध्ये करणार प्रवेश, मंत्री नितेश राणे यांची घोषणा

मंत्री नितेश राणे यांनी कोकणात राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील

मुसळधार पावसात दुचाकीवर झाड कोसळले आणि...

नवी दिल्ली : दिल्लीत कालकाजी येथे मुसळधार पावसात दुचाकीवर झाड कोसळले. या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले.

वरळी बीडीडी चाळीतील रहिवाशांना आज मिळणार हक्काचे घर

पहिल्या टप्प्यातील ५५६ पुनर्वसन सदनिकांचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण मुंबई : आशियातील नागरी

ICC वनडे क्रमवारीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर, बाबर आझमची घसरण

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने जाहीर केलेल्या ताज्या वनडे क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघाचा

येत्या १५ ऑगस्टपर्यंत मुंबईत घरोघरी तिरंगा फडकणार, महापालिकेचे नागरिकांना तिरंगा फडकवण्याचे आवाहन

मुंबई (खास प्रतिनिधी): केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त

राहुल गांधींच्या वकिलांचा यु-टर्न: “जीवाला धोका” म्हणणारा अर्ज परत घेणार

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वकिलांनी पुणे येथील न्यायालयात गांधींना वादी