Chhatrapati Sambhajinagar News : दत्तक घेतलेल्या ४ वर्षीय चिमुरडीला आई वडिलांनी संपवलं!

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगरच्या सिल्लोड येथे धक्कादायक घटना घडली आहे. ४ मुलानंतर मुलगी नाही म्हणून दत्तक घेतलेल्या ४ वर्षीय मुलीला सावत्र आई वडिलांनी मारहाण करुन तिचे हात-पाय मोडेपर्यंत तिला मारहाण करत तिची हत्या केली. या घटनेनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.




मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगरच्या सिल्लोड येथे राहणाऱ्या फौजिया शेख फईम आणि शेख आयुब फईम या नराधम आई वडिलांनी ४ मुलांनंतरही मुलगी होत नसल्याने एका चार वर्षीय मुलीला जालना येथून ५ हजाराला दत्तक घेतले होते. पतीच्या या निर्णयाला पत्नीचा विरोध होता. त्यामुळे या दोघांमध्ये खटके उडायला लागले होते. दोघांमधील वादाचं कारण ठरत असलेल्या चिमुरडीला दोघांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. या दांपत्याने त्या चिमुरडीचा अमानुष छळ सुरू केला. नराधम आई वडील तिला उपाशी ठेवायचे. बुधवारी रात्रीही जळत्या लाकडाने तिच्या पूर्ण अंगावर दोघांनी चटके दिले. तिचे हात व तळ पाय सांध्यातून मोडेपर्यंत तिला मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिच्या डोक्यात व पाठीत वजनदार वस्तूने जोरात वार करुन तिला गंभीर जखमी करण्यात आलं. विव्हळत असलेल्या चिमुकलीने अखेर बुधवारी (दि २६) मध्यरात्री तीन वाजता प्राण सोडले. या नराधम आई वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा