Gaurav Ahuja Pune : पुण्यात अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाची सुटका !

पुणे : पुण्यात रस्त्याच्या बाजूला उभा राहून अश्लील वर्तन करणाऱ्या गौरव आहुजा बद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. दि ८ मार्च रोजी पुण्याच्या शास्त्रीनगर जंक्शनवर बीएमडब्ल्यू कारमधून उतरुन सार्वजनिक ठिकाणी लघवी आणि अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या गौरव अहुजाची अखेर जामीनावर सुटका होणार असल्याची बातमी समोर आली आहे.



८ मार्च रोजी पुण्याच्या शास्त्रीनगर जंक्शनवर गौरव अहुजाने लघवी केली. तसेच अश्लिल वर्तन करुन दाखवले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर तो फरार होता. परंतु काही तासांतच गौरव आहुजाने एक व्हिडिओ प्रसारित करत घडल्या प्रकारावर माफी मागत, "मी आठ तासात पोलिसांसमोर हजर होईन" असं म्हटलं होतं. याप्रकरणी गौरव आहुजाच्या मित्राला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र आता तब्बल १७ दिवसांनी आरोपी गौरव अहुजाची जामिनावर सुटका होणार आहे. जामीन आदेशात असे म्हटले आहे की, आहुजाने सरकारी वकिलांच्या साक्षीदारांवर प्रभाव टाकू नये असा इशारा देण्यात आला आहे. सोबतच, न्यायालयाची परवानगी घेतल्याशिवाय त्याने भारत सोडू नये असे निर्देश देण्यात आले आहेत. न्यायालयाने गौरव आहुजाला दर सोमवारी सकाळी ११ ते दुपारी २ च्या दरम्यान येरवडा पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या