Santosh Deshmukh Murder Case : अखेर पापाचा घडा भरला! संतोष देशमुख हत्येप्रकरणातील आरोपींची हत्येची कबुली

  123

बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील नवीन अपडेट समोर आली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींपैकी मुख्य तीन आरोपींनी हत्येची कबुली दिली असल्याची माहिती मिळाली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसह आठ आरोपी आहेत. यातील कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे. याबाबत केज न्यायालयात सुनावणी झाली. परंतु, सुरक्षेचे कारण देत सीआयडीने हे प्रकरण बीड न्यायालयात चालवावे, अशी विनंती केली होती. त्याप्रमाणे बुधवारी पहिली सुनावणी बीड न्यायालयात पार पडली. यावेळी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी ३२ मिनिटांत खंडणी ते हत्या हा घटनाक्रम मांडला. तसेच सीसीटीव्ही फुटेज, सीडीआर, टॉवर लोकेशन, ऑडिओ-व्हिडीओ रेकॉर्डिंग असे पुरावे असल्याचे सांगितले. हेच पुरावे आम्हाला देण्यात यावेत, अशी विनंती आरोपींच्या वकिलांनी अर्ज करून केली. आता पुढील सुनावणी १० एप्रिल रोजी होणार आहे. त्याआधीच हत्येचा प्रमुख आरोपी सुदर्शन घुलेने पोलिसांसमोर कबूल केले आहे की, त्यानेच संतोष देशमुखांचे अपहरण करून हत्या केली. याशिवाय, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी देखील यासंबंधी आपली कबुली दिली असल्याची बातमी समोर आली आहे. सुदर्शन घुलेच्या कबुली नंतर वाल्मिक कराड अडचणीत येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ