Dubai connected to Mumbai by rail : दुबई ते मुंबईला रेल्वे मार्गाने जोडणार;संयुक्त अमिरातीची योजना

मुंबई : दुबई आणि मुंबईला थेट जोडणारा समुद्राखालचा रेल्वे मार्ग उभारण्याची योजना संयुक्त अमिरातीच्या डोक्यात घोळू लागली आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास संपूर्ण पाण्याखालून जाणारा २ हजार किलोमीटर लांबीचा हा पहिला रेल्वे मार्ग ठरेल.


मध्यपूर्व आणि भारताला जोडणारा संयुक्त अरब अमिरातीचा हा न भूतो न भविष्यती पायाभूत प्रकल्प समजला जातो. अमिरातीच्या राष्ट्रीय सल्लागार ब्युरोचे मुख्य सल्लागार आणि व्यवस्थापकीय संचालक अब्दुल्ला अल्शेही यांनी याप्रकल्पाची घोषणा केली. दुबई ते मुंबई जोडणारी समुद्राखालची रेल्वे उभारणे कितपत शक्य आहे, याचा अभ्यास करण्याची योजना हाती घेतल्याचे ते म्हणाले. दुबई ते मुंबई रेल्वे ही प्रचंड वेगवान असेल आणि हा रेल्वे मार्ग अंदाजे २ हजार किलोमीटर लांबीचा असू शकेल.



ही रेल्वे पूर्णत: समुद्राखालून जाईल. मुंबईहून निघणारी रेल्वे संयुक्त अरब अमिरातीच्या फूजैराह शहरात पोहोचेल. या प्रस्तावित रेल्वे प्रकल्पामुळे दोन्ही देशातला प्रवास आणि व्यापार वाढविण्याबरोबरच उभय देशात अरबांच्या तेलाची भारताला निर्यात आणि भारताच्या नर्मदेचे पाणी अरब देशांना आयात करण्याचा उद्देश या प्रकल्पामागे आहे, असे अब्दुल्ला म्हणाले.


अर्थात, दुबई-मुंबई जोडणार्या रेल्वे प्रकल्पाची कल्पना तूर्त कागदावरच आहे. या प्रकल्पाची आधी व्यवहार्यता तपासली जाईल. या प्रकल्पाच्या तांत्रिक, पर्यावरणीय आणि आर्थिक बाजू तपासल्या जातील. कारण, इंजिनिअरिंग क्षेत्रात केवळ चमत्कार म्हणूनच या प्रकल्पाकडे भविष्यात पाहिले जाऊ शकते.

Comments
Add Comment

BMC Waste Management : मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती: महानगरपालिकेकडे नोंदणी न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

मुंबई : घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी

BMC News : एकही मॅनहोल्स उघडे राहता कामा नये

महापालिका आयुक्तांनी दिले संबंधित खात्यांसह सहायक आयुक्तांनाही निर्देश मुंबई : सध्या सुरू असलेली सर्व

Devendra Fadnavis : कला, संस्कृती अन् खाद्यसंस्कृतीची ओळख पटवून देणारा 'माटी ९ पूर्वांचल महोत्सव' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती महान असून ही संस्कृती समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्राने anj पूर्वांचलने महत्त्वपूर्ण

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे

Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट

मुंबई : राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे ऊन अशी दुहेरी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. याच

मुलुंड कालिदास नाट्य गृह परिसरातील टर्फसह अनधिकृतरित्या बांधकामांवर कारवाई

महापौरांचे आदेश आणि दुसऱ्याच दिवशी कारवाईला सुरुवात मुंबई :मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा