Baleshah Pir Dargah : बेकायदा बालेशाह पीर दर्ग्यावर २० मेपूर्वी कारवाई होणार

  31

भाईंदर : भाईंदर पश्चिमेतील उत्तन येथील तारोडी डोंगरी परिसरात कांदळवन क्षेत्रात बांधलेल्या बेकायदा बालेशाह पीर दर्ग्याच्या (Baleshah Pir Dargah) मुद्द्याने जोर धरला आहे. ही जागा सरकारी मालकीची असून, त्यावर अनधिकृत बांधकाम करून अतिक्रमण करण्यात आले आहे. या प्रकरणी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले. त्यावर महसूल मंत्री बावनकुळे यांनी महसूल विभाग आणि मिरा भाईंदर महानगरपालिका यांनी एकत्रित कारवाई करत २० मेपूर्वी दर्गा हटविण्याचे आदेश दिले आहेत.


उत्तन परिसरात बालेशाह पीर दर्ग्याचे सुमारे ७ हजार चौरस फूट क्षेत्रफळावर अवैध बांधकाम करण्यात आले आहे. या अतिक्रमणाविरोधात अ‍ॅड. खुश खंडेलवाल यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. यापूर्वी त्यांनी महानगरपालिका, अपर तहसीलदार आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडेही तक्रारी केल्या होत्या. मात्र, कारवाई न झाल्याने त्यांनी थेट न्यायालयात धाव घेतली.



भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी विधानपरिषदेत हा मुद्दा मांडला. या जागेवर अतिक्रमण झाल्याचे तसेच वारंवार नोटिसा दिल्या तरीही ते वाढत असल्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी मान्य केले. २० मेपूर्वी या जागेवरील अतिक्रमण काढले जाईल, असे आश्वासन त्यांनी सभागृहात दिले.


यापूर्वी विधानसभेतही दर्ग्याच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. या जागेवर खारफुटी नष्ट करून बांधकाम केल्यामुळे पर्यावरणाला मोठे नुकसान होत असल्याचे भाजप पदाधिकारी रवी व्यास यांनी सांगितले. त्यांनी याप्रकरणी प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून, लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र