Baleshah Pir Dargah : बेकायदा बालेशाह पीर दर्ग्यावर २० मेपूर्वी कारवाई होणार

भाईंदर : भाईंदर पश्चिमेतील उत्तन येथील तारोडी डोंगरी परिसरात कांदळवन क्षेत्रात बांधलेल्या बेकायदा बालेशाह पीर दर्ग्याच्या (Baleshah Pir Dargah) मुद्द्याने जोर धरला आहे. ही जागा सरकारी मालकीची असून, त्यावर अनधिकृत बांधकाम करून अतिक्रमण करण्यात आले आहे. या प्रकरणी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले. त्यावर महसूल मंत्री बावनकुळे यांनी महसूल विभाग आणि मिरा भाईंदर महानगरपालिका यांनी एकत्रित कारवाई करत २० मेपूर्वी दर्गा हटविण्याचे आदेश दिले आहेत.


उत्तन परिसरात बालेशाह पीर दर्ग्याचे सुमारे ७ हजार चौरस फूट क्षेत्रफळावर अवैध बांधकाम करण्यात आले आहे. या अतिक्रमणाविरोधात अ‍ॅड. खुश खंडेलवाल यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. यापूर्वी त्यांनी महानगरपालिका, अपर तहसीलदार आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडेही तक्रारी केल्या होत्या. मात्र, कारवाई न झाल्याने त्यांनी थेट न्यायालयात धाव घेतली.



भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी विधानपरिषदेत हा मुद्दा मांडला. या जागेवर अतिक्रमण झाल्याचे तसेच वारंवार नोटिसा दिल्या तरीही ते वाढत असल्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी मान्य केले. २० मेपूर्वी या जागेवरील अतिक्रमण काढले जाईल, असे आश्वासन त्यांनी सभागृहात दिले.


यापूर्वी विधानसभेतही दर्ग्याच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. या जागेवर खारफुटी नष्ट करून बांधकाम केल्यामुळे पर्यावरणाला मोठे नुकसान होत असल्याचे भाजप पदाधिकारी रवी व्यास यांनी सांगितले. त्यांनी याप्रकरणी प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून, लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Comments
Add Comment

शाहरुख, सलमानला भेटा, ५० रुपयांत वांद्रयात फिरा

सध्या सगळीकडेच महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे अनेकांना वाटतं की मुंबईत फिरणं म्हणजे आपल्याला काही परवडणार

Mumbai: चेंबूरमधील संतापजनक घटना; एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

मुंबई: मुंबईत एक संतापजनक घटना समोर आली आहे. चेंबूरच्या टिळक नगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

मुंबई : राज्याच्या ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमंत्री मेघना

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या आनंदाची बातमी, १ जूनपासून...

मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या कोकणवासियांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील ८६४ पुनर्वसन सदनिकांचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार

मुंबई: आशियातील नागरी पुनरुत्थानाच्या सर्वात मोठ्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील नायगाव येथील

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा घुमली 'वनराणी'ची शिट्टी

- बॅटरीवर चालणाऱ्या इंजिनासह आधुनिक सेवा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई :