मानवधर्म

  32

सद्गुरू वामनराव पै


आम्ही कर्मकांडावर टीका किंवा ताशेरे ओढतो याचे कारण हेच आहे की आपल्या कर्मठ लोकांनी आपल्या धर्माचे, राज्याचे, देशाचे फार नुकसान केले. आपले छत्रपती शिवाजी महाराज किती महान, पण त्यांच्या राज्यभिषेकाच्या वेळी देखील बरेच काही घडले असे म्हणतात. अखेरीस काशीवरून गागाभट्ट यांना राज्याभिषेक करण्यासाठी बोलाविण्यात आले. कर्मठपणा किती, त्याला काही मर्यादा आहेत की नाहीत. ज्याच्यामुळे आपण जगतो आहोत, त्यालाच आपण सुखाने जगू देत नाहीत. जीवनविद्या तर असे सांगते की, जगातील सर्व धर्माचे सर्व लोक देवाधर्माच्या नावाखाली खूप काही करीत असतात, पण प्रत्यक्षात मात्र, ते जे काही करतात त्या कर्मकांडात देवही नसतो व धर्मही नसतो. सांगायचा मुद्दा, धर्म वाईट नाही, धर्म चांगलाच आहे. धर्माची सुरेख व्याख्या आहे. “ज्याने समाजाची सुरेख धारणा होते, तोच खरा धर्म”. धर्म हा पाहिजेच, पण कुठला धर्म? मानवधर्म. हा मानवधर्म म्हणजे काय? कित्येकदा बरीच माणसे केवळ दिसण्यापुरती माणसासारखी दिसतात, पण त्यांची वागणूक ही माणसांसारखी नसते. जेव्हा माणूस हा माणसासारखा वागायला लागेल तोच खरा मानवधर्म. किती सोपे आहे बघा.



माणूस माणसासारखा वागला की त्याच्या ठिकाणी असेल तोच मानवधर्म. पण आज तसे कोणी वागतंय का? इतर प्राणी त्यांच्या धर्माप्रमाणे वागतात, मात्र माणूस बरेचदा मानवधर्माला अनुसरून वागत नाही. वाघ हा वाघासारखाच वागणार, मात्र तो कधीही गाईसारखा वागणार नाही. कितीही भूक लागली तरीही चारा, गवत खाणार नाही. सर्प, गरुड, लांडगा हे सर्व इतर पशु-पक्षी देखील जन्माला आल्यापासून त्यांना निसर्गाने नेमून दिल्यासारखे जगतात. केवळ मनुष्य हा एकाच असा प्राणी आहे जो जन्माला येतो माणूस म्हणून मात्र माणसासारखा वागत, जगत नाही. हे असे का होते? याचे कारण म्हणजे त्यांना जी शिकवण घरातून, शाळा-कॉलेजमधून, धर्ममार्तंडांकडून म्हणजेच संस्कारातून, शिक्षणातून मिळते, त्यातून हे सगळे घडते. कडवटपणा, उच्चनीच, श्रेष्ठ-कनिष्ठ भेदभाव निर्माण होतात, त्यातून सगळे बिघडत जाते. मी नेहमी सांगतो की, जगात कोणी वरिष्ठ कोणी कनिष्ठ नाही, सगळेच श्रेष्ठ आहेत. कारण सर्वच या निसर्गाच्या व्यवस्थेत उपयुक्त आहेत.

Comments
Add Comment

ब्रह्मर्षी अत्री

भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी प्रजापतीने सृष्टीची निर्मिती केली तेव्हा त्याला वाटले, आपण निर्माण केलेल्या या

Horoscope: जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार या राशींचे अच्छे दिन, होणार प्रचंड धनलाभ

मुंबई: ३० जूनपासून नव्या आठवड्याला सुरूवात झाली आहे. हा आठवडा ३० जून ते ६ जुलैपर्यंत असणार आहे. ज्योतिष

Vastu shastra: ही कामे तुम्हाला बनवू शकतात कंगाल, कधीच करू नका

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार व्यक्तीच्या कर्मावर त्याला त्याचे फळ मिळत असते. काही कामे केल्याने नकारात्मक ऊर्जा

शरीर साक्षात परमेश्वर

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै अनंत कोटी ब्रह्मांड, अनंत रूपे अनंत वेषे अशी परमेश्वराची रूपे आहेत. अनंत कोटी

मंत्र वारीचा

ऋतुराज : ऋतुजा केळकर मंत्र वारीचा संतांच्या पायधूळीतून भिजतो मातीचा जीव... शब्दांच्या ओवाळणीतून गुंफतो भावाचा

स्वामी विवेकानंद : एक थोर युगपुरुष

आत्मज्ञान : प्राची परचुरे वैद्य ज्यांच्या विचारांनी सतत नवी ऊर्जा मिळते असे युवकांचे प्रेरणास्थान व आपल्या