CM Devendra Fadnavis : मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामीच्या कटात सुप्रिया सुळे, रोहित पवारांचा सहभाग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट


मुंबई : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीचा कट रचण्यात आला होता. या कटात संबंधित महिला आणि कथित पत्रकार तुषार खरात हेही होते. याशिवाय गोरे यांच्या बदनामीचे व्हिडिओ तयार केल्यानंतर ते आधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार तसेच माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना पाठविले जात होते, असा खळबळजनक गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केला.
गोरेंसारख्या एखाद्या नेत्याला आयुष्यातून उठवण्यासाठी असे करणे चुकीचे आहे. त्यामुळे याची चौकशी होईलच. पण सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी आत्मचिंतन केले पाहिजे. गोरे यांच्या हिमतीची मी दाद देतो की, त्यांनी बदनामीच्या मोहिमेविरुद्ध लढा दिला. पण शरद पवार गटाचे नेते त्यांच्या बदनामीत सामील होते. यासंदर्भात त्यांचे कॉल रेकॉर्डस आहेत आणि पुरावे आहेत, असा दावाही फडणवीस यांनी यावेळी केला.



विधानसभेत गेले दोन दिवस सुरु असलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील वादळी चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी जयकुमार गोरे यांच्या विरोधातील कथित आरोपांमधील हवा काढली. फडणवीस म्हणाले की, खरेतर गोरे यांच्याबाबतची खटला २०१९ मध्येच संपला होता. तेव्हा ते सत्ताधारी पक्षात सुद्धा नव्हते. पण हे प्रकरण पुन्हा उकरून काढण्यात आले. त्यासाठी कट रचला गेला. संबंधित महिलेने प्रकरण मिटविण्यासाठी लाच मागितली होती. तिचे संभाषण ध्वनिमुद्रित केल्यानंतर पोलिसांना या लाचेची खात्री पटली आणि त्यांनी त्यांनी सापळा रचून तिला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. तुषार खरात हा कथित पत्रकार आणि अनिल सुभेदार यालाही अटक करण्यात आली, अशी माहिती फडणवीस यांनी सभागृहाला दिली.


गोरेंविरुद्ध ज्यांनी कट रचला त्यात शरद पवार गटाचे लोक होते. हे मी पुराव्यानिशी सांगतो. यापैकी प्रभाकरराव देशमुख हे शंभरवेळा तिन्ही आरोपींशी बोलले आहेत. सुप्रिया सुळे, रोहित पवार, देशमुख यांच्याकडे गोरेंच्या बदनामीचे व्हिडिओ जारी करण्याआधी जात असत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची ग्वाही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार

मुंबई : महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य

कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता

आता बँकेसारख्या सुविधा लवकरच! मुंबई : देशातील कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता आहे. गेल्या काही