ATM : एटीएममधून पैसे काढणे महाग होणार

नवी दिल्ली : एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे. नव्या नियमानुसार ग्राहकाला होम बँकेतून अर्थात ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्याऐवजी दुसऱ्या कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी प्रत्येकवेळी १९ रुपये एवढे शुल्क आकारले जाईल. तसेच होम बँकेऐवजी दुसऱ्या कोणत्याही बँकेच्या एटीएममधून बॅलन्स अर्थात खात्यात किती रक्कम शिल्लक आहे याची तपासणी करण्यासाठी प्रत्येकवेळी ७ रुपये एवढे शुल्क आकारले जाईल. आधी होम बँकेऐवजी दुसऱ्या कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी प्रत्येकवेळी १७ रुपये एवढे शुल्क आकारले जात होते. तसेच होम बँकेऐवजी दुसऱ्या कोणत्याही बँकेच्या एटीएममधून बॅलन्स तपासण्यासाठी ६ रुपये एवढे शुल्क आकारले जात होते. नवे नियम १ मे २०२५ पासून लागू होणार आहेत.



शहरात राहणाऱ्या ग्राहकाला होम बँकेतून अर्थात ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेच्या एटीएममधून कमाल पाच वेळा विनामूल्य पैसे काढण्याची मुभा आहे. तर ग्रामीण भागात राहणाऱ्या ग्राहकाला होम बँकेतून अर्थात ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेच्या एटीएममधून कमाल तीन वेळा विनामूल्य पैसे काढण्याची मुभा आहे. नेटबँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय यापैकी एखादा पर्याय वापरुन बॅलन्स तपासण्यासाठी पैसे आकारले जाणार नाही.



नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेने सादर केलेल्या या प्रस्तावाला रिझर्व्ह बँकेची मंजुरी मिळाली आहे. यामुळे देशातील सर्व बँका १ मे २०२५ पासून एटीएम, नेटबँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय यासाठी नवे नियम लागू करतील.

 
Comments
Add Comment

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

अखेर महापौर चषक स्पर्धा होणार; सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद

मुंबई: डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी