ATM : एटीएममधून पैसे काढणे महाग होणार

  71

नवी दिल्ली : एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे. नव्या नियमानुसार ग्राहकाला होम बँकेतून अर्थात ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्याऐवजी दुसऱ्या कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी प्रत्येकवेळी १९ रुपये एवढे शुल्क आकारले जाईल. तसेच होम बँकेऐवजी दुसऱ्या कोणत्याही बँकेच्या एटीएममधून बॅलन्स अर्थात खात्यात किती रक्कम शिल्लक आहे याची तपासणी करण्यासाठी प्रत्येकवेळी ७ रुपये एवढे शुल्क आकारले जाईल. आधी होम बँकेऐवजी दुसऱ्या कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी प्रत्येकवेळी १७ रुपये एवढे शुल्क आकारले जात होते. तसेच होम बँकेऐवजी दुसऱ्या कोणत्याही बँकेच्या एटीएममधून बॅलन्स तपासण्यासाठी ६ रुपये एवढे शुल्क आकारले जात होते. नवे नियम १ मे २०२५ पासून लागू होणार आहेत.



शहरात राहणाऱ्या ग्राहकाला होम बँकेतून अर्थात ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेच्या एटीएममधून कमाल पाच वेळा विनामूल्य पैसे काढण्याची मुभा आहे. तर ग्रामीण भागात राहणाऱ्या ग्राहकाला होम बँकेतून अर्थात ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेच्या एटीएममधून कमाल तीन वेळा विनामूल्य पैसे काढण्याची मुभा आहे. नेटबँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय यापैकी एखादा पर्याय वापरुन बॅलन्स तपासण्यासाठी पैसे आकारले जाणार नाही.



नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेने सादर केलेल्या या प्रस्तावाला रिझर्व्ह बँकेची मंजुरी मिळाली आहे. यामुळे देशातील सर्व बँका १ मे २०२५ पासून एटीएम, नेटबँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय यासाठी नवे नियम लागू करतील.

 
Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.