रेल्वेतून नोटांची तस्करी, दोघांना अटक

केरळ : केरळमधील पुनलुर स्थानकावरुन रेल्वे संरक्षण दलाच्या (Railway Protection Force or RPF) जवानांनी दोन जणांना अटक केली आहे. रेल्वेतून नोटांची तस्करी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अटक केलेल्यांकडून नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या नोटा खऱ्या आहेत की खोट्या याची तपासणी सुरू आहे. आरोपींकडून ५०० रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात एकूण ४४ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.



पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये तयार केलेल्या बनावट भारतीय नोटा वेगवेगळ्या मार्गाने भारतात पाठवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याआधी उत्तर प्रदेशमधील अलीगड येथे एसओजी आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करुन तीन जणांना अटक केली. अटक केलेल्यांकडून ५०० रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात एकूण ७७ हजार रुपये जप्त करण्यात आले. या सर्व बनावट नोटा असल्याचे लक्षात आले. यामुळे केरळमध्ये अटक केलेले दोघे बनावट नोटा घेऊन जात होते की कोणाचा काळा पैसा सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी तस्करांची मदत घेतली जात होती, याचा तपास सुरू आहे.



केरळमध्ये अटक केलेल्या मुत्थु (५८) आणि अलगप्पन (५८) या दोघांची चौकशी सुरू आहे. अटक केलेले दोघे मदुराईचे निवासी आहेत. दोघांना जप्त केलेल्या नोटांप्रकरणी पोलिसांना समाधानकारक माहिती देता आलेली नाही. मुत्थु आणि अलगप्पन या दोघांनी कंबरेजवळ कापडात गुंडाळून नोटा बांधून ठेवल्या होत्या. आरपीएफच्या जवानांनी गर्दीत उभे राहून गाडीत चढत असताना या दोघांना अडवले आणि चौकशी केली. अंगझडती घेतली त्यावेळी दोघांनी कंबरेजवळ कापडात गुंडाळून ठेवलेल्या नोटा आढळल्या आहेत. या प्रकरणी तपास सुरू आहे.
Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही