'या' मोबाईल नंबरचे UPI अकाऊंट एक एप्रिलपासून बंद होणार

मुंबई : नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयचे नवे निर्देश एक एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहेत. हे निर्देश लागू झाल्यानंतर बँका आणि यूपीआय अ‍ॅप इनअ‍ॅक्टिव्ह असलेले मोबाईल त्यांच्या यंत्रणेतून काढून टाकणार आहेत. जे मोबाईल नंबर काढून टाकले जातील त्या नंबरांचा वापर करुन नंतर कधीही कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन व्यवहार करता येणार नाही. काढून टाकलेल्या नंबरांचा वापर मोबाईल वॉलेट आणि यूपीआय व्यवहारांसाठीही करता येणार नाही. या प्रक्रियेत फक्त जे मोबाईल नंबर इनअ‍ॅक्टिव्ह असतील, तेच काढून टाकण्यात येणार आहेत.



इनअ‍ॅक्टिव्ह मोबाईल नंबर म्हणजे रिचार्ज संपल्यानंतर पुढील ९० दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळ रिचार्ज न केल्यामुळे बंद झालेले मोबाईल नंबर. हे इनअ‍ॅक्टिव्ह मोबाईल नंबर अॅक्टिव्हेट करता येतील की नाही याची अधिकृत माहिती संबंधित मोबाईल नंबरचे सर्व्हिस प्रोव्हायडर अर्थात सेवा प्रदाता देऊ शकतात. यामुळे आपला नंबर इनअॅक्टिव्ह झाला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी संबंधित नंबरच्या सर्व्हिस प्रोव्हायडरशी अथवा संबंधित नंबर ज्या कंपनीचा आहे त्यांच्या गॅलरीशी संपर्क साधणे हिताचे आहे.



हल्ली UPI द्वारे करायचे आर्थिक व्यवहार तसेच मोबाईल वॉलेट, बँकिंग, ऑनलाईन व्यवहार यासाठी मोबाईल नंबर महत्त्वाचा असतो. हा नंबर संबंधित व्यक्तीला ऑनलाईन आर्थिक व्यवहारांसाठी आवश्यक आहे. याच कारणामुळे एनपीसीआयच्या निर्देशानुसार इनअ‍ॅक्टिव्ह मोबाईल नंबरद्वारे आर्थिक व्यवहार होऊ नये यासाठ हे उपाय करण्याचा निर्णय झाला आहे.
Comments
Add Comment

Ind vs Eng : भारत - इंग्लंड तिसरी ODI किती वाजता सुरू होणार ? कशी असेल लॉर्ड्सची खेळपट्टी ?

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक सामना शनिवार १९ जुलै रोजी लंडन येथील लॉर्ड्स मैदानावर

US Visa : एफ-१ आणि जे-१ व्हिसाधारकांसाठी अमेरिकेचे नवे नियम; भारतीय विद्यार्थ्यांची वाढली चिंता

नवी दिल्ली : अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने (डीएचएस) स्थलांतराशी संबंधित एक नवा आणि कठोर नियम लागू

Jammu and Kashmir Flood : जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा कहर; 8 जणांचा मृत्यू, 6 बेपत्ता; अमरनाथ-वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली.

Maharashtra Weather : आनंदाची बातमी! महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होणार, कोकणात ४८ तासांत पाऊस पडणार

मुंबई : मागील दीड महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. आता राज्यात पुन्हा एकदा

Vaishno Devi Yatra : हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे अमरनाथ आणि माता वैष्णो देवी यात्रा स्थगित

मुंबई : हवामान विभागाने दिलेल्या तीव्र हवामानाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून

Malad Sewage Treatment Plant : मालाड मलजल प्रक्रिया केंद्राला खारफुटीसह इतर परवानगी प्राप्त; महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी):  मुंबई मलनिस्सारण प्रकल्प विभागाने ४५४ दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या मालाड मलजल