'या' मोबाईल नंबरचे UPI अकाऊंट एक एप्रिलपासून बंद होणार

मुंबई : नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयचे नवे निर्देश एक एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहेत. हे निर्देश लागू झाल्यानंतर बँका आणि यूपीआय अ‍ॅप इनअ‍ॅक्टिव्ह असलेले मोबाईल त्यांच्या यंत्रणेतून काढून टाकणार आहेत. जे मोबाईल नंबर काढून टाकले जातील त्या नंबरांचा वापर करुन नंतर कधीही कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन व्यवहार करता येणार नाही. काढून टाकलेल्या नंबरांचा वापर मोबाईल वॉलेट आणि यूपीआय व्यवहारांसाठीही करता येणार नाही. या प्रक्रियेत फक्त जे मोबाईल नंबर इनअ‍ॅक्टिव्ह असतील, तेच काढून टाकण्यात येणार आहेत.



इनअ‍ॅक्टिव्ह मोबाईल नंबर म्हणजे रिचार्ज संपल्यानंतर पुढील ९० दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळ रिचार्ज न केल्यामुळे बंद झालेले मोबाईल नंबर. हे इनअ‍ॅक्टिव्ह मोबाईल नंबर अॅक्टिव्हेट करता येतील की नाही याची अधिकृत माहिती संबंधित मोबाईल नंबरचे सर्व्हिस प्रोव्हायडर अर्थात सेवा प्रदाता देऊ शकतात. यामुळे आपला नंबर इनअॅक्टिव्ह झाला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी संबंधित नंबरच्या सर्व्हिस प्रोव्हायडरशी अथवा संबंधित नंबर ज्या कंपनीचा आहे त्यांच्या गॅलरीशी संपर्क साधणे हिताचे आहे.



हल्ली UPI द्वारे करायचे आर्थिक व्यवहार तसेच मोबाईल वॉलेट, बँकिंग, ऑनलाईन व्यवहार यासाठी मोबाईल नंबर महत्त्वाचा असतो. हा नंबर संबंधित व्यक्तीला ऑनलाईन आर्थिक व्यवहारांसाठी आवश्यक आहे. याच कारणामुळे एनपीसीआयच्या निर्देशानुसार इनअ‍ॅक्टिव्ह मोबाईल नंबरद्वारे आर्थिक व्यवहार होऊ नये यासाठ हे उपाय करण्याचा निर्णय झाला आहे.
Comments
Add Comment

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा.

Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि

Devendra Fadnavis : इंधन, परकीय चलन बचत आणि स्वदेशीला प्राधान्य देऊया!

मुंबई : "आखाती युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटकाळात इंधन बचत, परकीय चलनाचे जतन आणि स्वदेशी वस्तूंना

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Underwater Tourism : सिंधुदुर्गात भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प

सिंधुदुर्गनगरी : निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि सागरी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग