Pune News : धक्कादायक! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडली ६ ते ७ अर्भकं आणि मानवी अवशेष

Share

पुणे : पुण्यातील दौंड शहरात असणाऱ्या कचऱ्याच्या ढिगार्‍यात अर्भक आणि मानवी शरीराचे काही अवशेष आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.यामुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Pune News)

मिळालेल्या माहितीनुसार, दौंड शहरालगत (Daund Crime) असणाऱ्या बोरावके नगरमध्ये प्राईम टाऊनच्या पाठीमागे असणाऱ्या कचऱ्याच्या ढिगार्‍यात अर्भक आणि मानवी शरीराचे काही अवशेष आढळून आले. स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या ११२ क्रमांकाला फोन करून या संदर्भातील माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच दौंड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.त्यानंतर पोलिसांनी पाहणी अंती पंचनामा करून डॉक्टरांचे वैद्यकीय पथक देखील या ठिकाणी बोलावले. हे अर्भक आणि अवशेष ताब्यात घेण्यात आले असून हे या ठिकाणी कसे आले याचा शोध आता दौंड पोलीस करत आहेत.

हे अर्भक आणि काही मानवी शरीराचे अवशेष सीलबंद बरण्यांमध्ये ठेवली असून त्यावरती त्या संदर्भातील माहिती देखील आहे आणि ते २०२० मधील आहेत अशी प्राथमिक माहिती आता समोर आली आहे. मात्र, या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हे अर्भक आणि मानवी शरीराचे अवशेष कसे आले याचा शोध दौंड पोलीस घेत आहेत.हा गर्भपाताचा प्रकार आहे का या दृष्टीने देखील दौंड पोलीस सध्या तपास करत आहेत.वैद्यकीय तज्ञांच्या अहवालानुसार पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.

Recent Posts

RCB vs PBKS, IPL 2025: बंगलोरच्या मैदानावर पंजाब किंग्सचा ‘रॉयल’ विजय

बंगलोर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३४व्या सामन्यात आज पंजाब किंग्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला हरवले…

6 hours ago

युनेस्कोच्या यादीत भगवद्गीतेचा समावेश

नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला…

8 hours ago

हिंदी भाषा सक्ती विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक

घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात…

8 hours ago

गुन्ह्याची माहिती असताना वैभव नाईक यांनी ती का लपवली? आमदार निलेश राणे यांचा सवाल

या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करा कुडाळ : वैभव नाईक जेव्हा आमदार…

8 hours ago

नवी मुंबईत २८३.७०० किलो प्लास्टिक जप्त

नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास…

8 hours ago

हिंदी राष्ट्रभाषा शिकली पाहिजे, चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य

मुंबई : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात…

9 hours ago