Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरला ३ दिवसांची पोलीस कोठडी

  64

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत (Chhatrapati Shivaji Maharaj) आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) काल (२४ मार्च) तेलंगणातून अटक केली. आज (२५ मार्च) त्याला कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.


यावेळी प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचे दाखले देत अटकेवर आक्षेप घेतला. पोलिसांनी चौकशीसाठी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती, मात्र न्यायालयाने ती नाकारत तीन दिवसांचीच कोठडी मंजूर केली.



प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी युक्तिवाद करताना, "तो तपासात सहकार्य करत असल्याचे आधीच सांगितले असताना अटक करण्याची गरज नव्हती," असा मुद्दा मांडला. तसेच, त्याच्यावर लावण्यात आलेल्या कलमांनुसार सात वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते, मग अटकेची गरज काय?" असा सवाल उपस्थित केला. यावर सरकारी वकिलांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊनच अटकेची कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट केले.


सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, प्रशांत कोरटकरच्या विधानांमुळे मोठे तणाव निर्माण झाले आहेत आणि त्याचे व्हॉइस सॅम्पल घेण्याची गरज आहे. तसेच, त्याने स्वतःहून मोबाईल जमा न करता त्यातील डेटा डिलीट केल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. तो महिनाभर फरार होता, त्यामुळे अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.


वकील असिम सरोदे यांनी नमूद केले की, आवाजाचे नमुने वैज्ञानिक पद्धतीने घेतले जातात आणि त्यामध्ये स्वर व व्यंजन महत्त्वाचे असतात. आरोपीचा आवाज बदलला जाण्याची शक्यता असल्यामुळे वेगवेगळ्या वेळी त्याची जबानी घेणे गरजेचे आहे.


या प्रकरणी कोल्हापूर न्यायालयात सुनावणी सुरू असताना शिवप्रेमी आक्रमक झाल्याचे चित्र दिसून आले. सुनावणीनंतर प्रशांत कोरटकरला कोर्टाबाहेर आणले असता एका शिवप्रेमीने त्याला चप्पल दाखवण्याचा प्रयत्न केला. तसेच, न्यायालयात हजर करण्यापूर्वीही परिसरात मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी उपस्थित होते. एका व्यक्तीने हातात कोल्हापूरी चप्पल घेत "हे ९ नंबरचे पायताण बरोबर प्रशांत कोरटकरच्या गालावर उठवायचे आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत