Mumbai : मुंबईतील दादरचा कबुतरखाना बंद होणार ?

मुंबई : दादरचा कबुतरखाना तसेच मुंबईतील सर्व अनधिकृत कबुतरखाने बंद करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा केली आहे. मनसेच्या या मागणीमुळे दादरचा कबुतरखाना तसेच मुंबईतील सर्व अनधिकृत कबुतरखाने कायमचे बंद होण्याची शक्यता वाढली आहे. मनसेच्या पर्यावरण सेनेने दादरचा कबुतरखाना तसेच मुंबईतील सर्व अनधिकृत कबुतरखाने बंद करण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस यांच्याकडे मागणी केली आहे. याआधी अनेक मुंबईकरांनीही दादर आणि मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणाच्या कबुतरखान्यांविषयी नाराजी व्यक्त केली आहे. स्वच्छता राखण्यासाठी आणि श्वसनाच्या आजारांवर नियंत्रण राखता यावे म्हणून कबुतरखान्यांना विरोध सुरू आहे.



मुंबईतील कबुतरांची (pigeon) संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे श्वसनाच्या आजाराचा धोकाही वाढत आहे. या विषयावर गेल्या काही वर्षांपासून समाजाच्या विविध स्तरातून जनजागृती सुरू आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेने कबुतरखान्यांना विरोध केला आहे.



कबुतरखान्यांना विरोध मागील काही वर्षांपासून सुरू आहे. आता याची तीव्रता वाढू लागली आहे. अनधिकृत कबुतरखाने वाढू लागल्यामुळे मनसेने जाहीरपणे मुंबईतील कबुतरखान्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. यामुळे मुंबतल कबुतरखाने बंद होण्याची शक्यता वाढली आहे.

मुंबईत ठिकठिकाणी कबुतरांसाठी धान्य विकणाऱ्यांची संख्या वाढली आहे. हे धान्य विकत घेऊन तिथेच कबुतरांसाठी टाकले जात असल्यामुळे कबुतरांची संख्या वाढते आहे. ही कबुतरे मग आजूबाजूच्या रहिवासी इमारतीच्या खिडक्यांमध्ये घर करतात. त्यामुळे त्यांच्या विष्ठेतून व पिसांमधून श्वसनाचे आजार पसरत आहेत. नागरिकांच्या जिवाशी खेळणारे हे अनधिकृत कबुतरखाने बंद झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे, असे मनसेच्या पर्यावरण विभागाचे अध्यक्ष जय शृंगारपुरे यांनी सांगितले.
Comments
Add Comment

मुंबईतले आठ हजार बॅनर हटवले

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबईत नवरात्रौत्सवात मोठ्याप्रमाणात शुभेच्छांचे बॅनर आणि फलक लावण्यात आले होते. यामुळे

बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ३१ ऑक्टोबरपर्यंत भव्य ग्रंथ प्रदर्शन

मुंबई : अभिजात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने व मॅजेस्टिक ग्रंथ दालनाच्या

महापालिका आयुक्तांनी घेतला मुंबईतील दोन प्रमुख रस्ते प्रकल्प कामांचा आढावा, दिले असे निर्देश

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे ते भाईंदर प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक

मुंबई २०३० पर्यंत रेबीजमुक्त करणार, महापालिकेचा निर्धार

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

मुंबई: मुंबईत शुक्रवारी रात्री थरारक सुटकेची घटना घडली. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या खड्ड्यात तरूणाचा

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल