Mumbai : मुंबईतील दादरचा कबुतरखाना बंद होणार ?

  69

मुंबई : दादरचा कबुतरखाना तसेच मुंबईतील सर्व अनधिकृत कबुतरखाने बंद करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा केली आहे. मनसेच्या या मागणीमुळे दादरचा कबुतरखाना तसेच मुंबईतील सर्व अनधिकृत कबुतरखाने कायमचे बंद होण्याची शक्यता वाढली आहे. मनसेच्या पर्यावरण सेनेने दादरचा कबुतरखाना तसेच मुंबईतील सर्व अनधिकृत कबुतरखाने बंद करण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस यांच्याकडे मागणी केली आहे. याआधी अनेक मुंबईकरांनीही दादर आणि मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणाच्या कबुतरखान्यांविषयी नाराजी व्यक्त केली आहे. स्वच्छता राखण्यासाठी आणि श्वसनाच्या आजारांवर नियंत्रण राखता यावे म्हणून कबुतरखान्यांना विरोध सुरू आहे.



मुंबईतील कबुतरांची (pigeon) संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे श्वसनाच्या आजाराचा धोकाही वाढत आहे. या विषयावर गेल्या काही वर्षांपासून समाजाच्या विविध स्तरातून जनजागृती सुरू आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेने कबुतरखान्यांना विरोध केला आहे.



कबुतरखान्यांना विरोध मागील काही वर्षांपासून सुरू आहे. आता याची तीव्रता वाढू लागली आहे. अनधिकृत कबुतरखाने वाढू लागल्यामुळे मनसेने जाहीरपणे मुंबईतील कबुतरखान्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. यामुळे मुंबतल कबुतरखाने बंद होण्याची शक्यता वाढली आहे.

मुंबईत ठिकठिकाणी कबुतरांसाठी धान्य विकणाऱ्यांची संख्या वाढली आहे. हे धान्य विकत घेऊन तिथेच कबुतरांसाठी टाकले जात असल्यामुळे कबुतरांची संख्या वाढते आहे. ही कबुतरे मग आजूबाजूच्या रहिवासी इमारतीच्या खिडक्यांमध्ये घर करतात. त्यामुळे त्यांच्या विष्ठेतून व पिसांमधून श्वसनाचे आजार पसरत आहेत. नागरिकांच्या जिवाशी खेळणारे हे अनधिकृत कबुतरखाने बंद झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे, असे मनसेच्या पर्यावरण विभागाचे अध्यक्ष जय शृंगारपुरे यांनी सांगितले.
Comments
Add Comment

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :

Monsoon Disease: मुंबईकरांनो सावधान! शहरात ‘या’ ३ रोगांचा कहर

मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्णसंख्या वाढल्याने महानगरपालिका सतर्क मुंबई:  शहरात गेली अनेक

मिठीचा गाळ, गोतास काळ; ७,००० पानांचे आरोपपत्र, मोठे मासे सापडणार!

मुंबई पोलिसांकडून मिठी नदी गाळ काढणी घोटाळा उघड ६५.५४ कोटींचा धक्कादायक प्रकार! मुंबई : ६५.५४ कोटींच्या मिठी

सांगा चूक कोणाची? लपवाछपवी कोणासाठी? बीएमसी आणि म्हाडामध्ये घमासान!

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) यांच्यात चांदिवलीतील

वसई विरार मनपाच्या माजी आयुक्तांनंतर आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर ED ची धाड

मुंबई : वसई विरारचे महापालिकेचे महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्यावर ED नं काही दिवसांपूर्वीच धाड टाकली

हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी बनवले फेक इन्स्टाग्राम अकाउंट

मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात एप्रिल महिन्यात एका वीस वर्षीय तरुणाने एका व्यक्तीला धारदार हत्याराने वार करत