Mumbai : मुंबईतील दादरचा कबुतरखाना बंद होणार ?

मुंबई : दादरचा कबुतरखाना तसेच मुंबईतील सर्व अनधिकृत कबुतरखाने बंद करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा केली आहे. मनसेच्या या मागणीमुळे दादरचा कबुतरखाना तसेच मुंबईतील सर्व अनधिकृत कबुतरखाने कायमचे बंद होण्याची शक्यता वाढली आहे. मनसेच्या पर्यावरण सेनेने दादरचा कबुतरखाना तसेच मुंबईतील सर्व अनधिकृत कबुतरखाने बंद करण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस यांच्याकडे मागणी केली आहे. याआधी अनेक मुंबईकरांनीही दादर आणि मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणाच्या कबुतरखान्यांविषयी नाराजी व्यक्त केली आहे. स्वच्छता राखण्यासाठी आणि श्वसनाच्या आजारांवर नियंत्रण राखता यावे म्हणून कबुतरखान्यांना विरोध सुरू आहे.



मुंबईतील कबुतरांची (pigeon) संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे श्वसनाच्या आजाराचा धोकाही वाढत आहे. या विषयावर गेल्या काही वर्षांपासून समाजाच्या विविध स्तरातून जनजागृती सुरू आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेने कबुतरखान्यांना विरोध केला आहे.



कबुतरखान्यांना विरोध मागील काही वर्षांपासून सुरू आहे. आता याची तीव्रता वाढू लागली आहे. अनधिकृत कबुतरखाने वाढू लागल्यामुळे मनसेने जाहीरपणे मुंबईतील कबुतरखान्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. यामुळे मुंबतल कबुतरखाने बंद होण्याची शक्यता वाढली आहे.

मुंबईत ठिकठिकाणी कबुतरांसाठी धान्य विकणाऱ्यांची संख्या वाढली आहे. हे धान्य विकत घेऊन तिथेच कबुतरांसाठी टाकले जात असल्यामुळे कबुतरांची संख्या वाढते आहे. ही कबुतरे मग आजूबाजूच्या रहिवासी इमारतीच्या खिडक्यांमध्ये घर करतात. त्यामुळे त्यांच्या विष्ठेतून व पिसांमधून श्वसनाचे आजार पसरत आहेत. नागरिकांच्या जिवाशी खेळणारे हे अनधिकृत कबुतरखाने बंद झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे, असे मनसेच्या पर्यावरण विभागाचे अध्यक्ष जय शृंगारपुरे यांनी सांगितले.
Comments
Add Comment

महापालिकेच्या मालमत्ता विभागांमध्ये वर्षांनुवर्षे अधिकारी एकाच जागेवर, विकासकांची साठेलोटे असल्याचा बीआयटी चाळीतील भाडेकरुंचा आरोप

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या मालमत्ता विभागात मागील १६ वर्षांपासून अधिकारी कार्यरत असून यातील

दादर पश्चिमेची वाहतूक कोंडी सुटणार

जे. के. सावंत मार्ग जोडणारा येलवे रस्ता सेनापती बापट मार्गाला जोडणार मुंबई : एलफिन्स्टन पूल बंद करण्यात आल्याने

मुंबईत आधीपासूनच ८ ठिकाणी भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण, लसीकरण

मुलुंडमध्ये विरोध झाल्याने महापालिका अधिकारी झाले अवाक् मुंबई : महानगरपालिकेच्या सहकार्याने मुंबईत एकूण ८

भरती परीक्षेच्या निकालानंतर चार दिवसांत नियुक्तीपत्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश मुंबई (प्रतिनिधी) : शासकीय सेवांमध्ये विविध पदांच्या

वरळी विधानसभेत प्रभाग आरक्षित झाल्याने मनसेची पंचाईत

भाजप, शिवसेनेच्या वाट्याला येणार प्रत्येकी तीन प्रभाग यंदा वरळीत भाजप कमळ फुलवणार? सचिन धानजी मुंबई : दक्षिण

राज्यात अनेक जिल्ह्यांना आज थंडीचा इशारा

मुंबई : राज्यात सर्वदूर तापमानाचा पारा कमालीचा घसरला आहे. गेले अनेक दिवस थंडीचा कडाका कायम असून मंगळवारी (दि. १८