Vidyavihar Fire : विद्याविहार येथील इमारतीला भीषण आग

सुरक्षारक्षकाचा होरपळून मृत्यू, एकजण जखमी


मुंबई : विद्याविहार येथील नाथानी मार्गावरील नीलकंठ किंगडम कॉम्प्लेक्सला सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास अचानक आग लागली. या भीषण दुर्घटनेत इमारतीतील सुरक्षारक्षक उदय गांगण (४३) यांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच, अन्य एक सुरक्षा रक्षक जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, इमारतीला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी प्रयत्न करत आहेत.


नीलकंठ किंगडम कॉम्प्लेक्समधील तक्षशिला या तेरा मजली इमारतीला सोमवारी पहाटे आग लागली. इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आग लागली होती. सर्वजण साखरझोपेत असल्यामुळे आग लागल्याचे कोणाच्या लक्षात आले नाही. हळूहळू आगीची तीव्रता वाढू लागली आणि सुमारे ५ घरांमध्ये आग पसरली. घरात धूर पसरल्याने गाढ झोपेत असलेल्या रहिवाशांना जाग आली व आरडाओरडा करत त्यांनी अन्य रहिवाशांनाही जागे केले.



वाचण्यासाठी त्यांनी इमारतीबाहेर पळ काढला. मात्र, अनेकांना आग आणि धुरामुळे बाहेर पडता आले नाही. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य हाती घेतले. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना आगीतून बाहेर बाहेर काढले. तसेच, उपचारासाठी जखमींना नजीकच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून दुर्घटनास्थळी अग्निशमन दलातर्फे कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.

Comments
Add Comment

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी केईएम रुग्णालयाला दिले व्हेंटिलेटर दान!

मुंबई: केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विख्यात गायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी

Mehli Mistry Exit : टाटा समूहात मोठा भूंकप! नोएल टाटांनी करून दाखवलं; रतन टाटांच्या 'या' जवळच्या व्यक्तीची ट्रस्टमधून हकालपट्टी

मुंबई : उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर टाटा समूहाच्या महत्त्वाच्या धर्मादाय संस्थांमध्ये (Charitable Trusts)

बोरिवलीत २१ वर्षीय तरुणी ‘अ‍ॅग्रीमेंट रिलेशनशिप’ मध्ये; कुटुंबाची विश्व हिंदू परिषदेकडे धाव

मुंबई : मुंबईतील बोरिवली परिसरात एका २१ वर्षीय तरुणीने लग्न न करता एका मुस्लिम तरुणासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप

राज्यामध्ये दरदिवशी ६१ बालकांवर अत्याचार

मुंबई : राज्यात बालकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यांचा आलेख चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. राष्ट्रीय

दहावी परीक्षेच्या अर्ज भरण्याची मुदतवाढ; जाणून घ्या, आता किती दिवस मिळणार अतिरिक्त संधी

10th SSC Board Exam 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या

विरार ते थेट मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास होणार सिग्नल-फ्री

प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार मुंबई : उत्तन-वसई-विरार सी लिंक प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाने अंतिम मान्यता