Vidyavihar Fire : विद्याविहार येथील इमारतीला भीषण आग

सुरक्षारक्षकाचा होरपळून मृत्यू, एकजण जखमी


मुंबई : विद्याविहार येथील नाथानी मार्गावरील नीलकंठ किंगडम कॉम्प्लेक्सला सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास अचानक आग लागली. या भीषण दुर्घटनेत इमारतीतील सुरक्षारक्षक उदय गांगण (४३) यांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच, अन्य एक सुरक्षा रक्षक जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, इमारतीला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी प्रयत्न करत आहेत.


नीलकंठ किंगडम कॉम्प्लेक्समधील तक्षशिला या तेरा मजली इमारतीला सोमवारी पहाटे आग लागली. इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आग लागली होती. सर्वजण साखरझोपेत असल्यामुळे आग लागल्याचे कोणाच्या लक्षात आले नाही. हळूहळू आगीची तीव्रता वाढू लागली आणि सुमारे ५ घरांमध्ये आग पसरली. घरात धूर पसरल्याने गाढ झोपेत असलेल्या रहिवाशांना जाग आली व आरडाओरडा करत त्यांनी अन्य रहिवाशांनाही जागे केले.



वाचण्यासाठी त्यांनी इमारतीबाहेर पळ काढला. मात्र, अनेकांना आग आणि धुरामुळे बाहेर पडता आले नाही. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य हाती घेतले. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना आगीतून बाहेर बाहेर काढले. तसेच, उपचारासाठी जखमींना नजीकच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून दुर्घटनास्थळी अग्निशमन दलातर्फे कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.

Comments
Add Comment

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास

Smruti Mandhana And Palash muchhal : स्मृती मानधना–पलाश मुच्छल पुन्हा एकत्र? बांद्र्यातील 'त्या' व्हिडिओने चर्चांना उधाण

मुंबई : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या नात्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना

Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम जिष्णू देव वर्मा यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय

Bhondubaba Ashok Kharat : भोंदू खरातविरोधात तक्रारींचा महापूर, लैंगिक शोषणाचे आणखी ११ आरोप

मुंबई : वासनांध अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून, तक्रारींची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे.

Bmc News, Andheri Subway : अंधेरी सब वे मधील पावसाचे तुंबणारे पाणी,  महापौरांनी  रेल्वेशी समन्वय राखून गती देण्याचे महापालिकेला दिले निर्देश

मुंबई : अंधेरी भूयारी मार्ग हा अतिसखल परिसर असल्याने पावसाळ्यात पाणी साचून वाहतुकीला अडथळा होतो. त्यावर

Bmc News : मुंबईत यापूर्वी खरेदी केलेल्या कचरा पेट्या गेल्या कुठे? महापालिका प्रशासनावर स्थायी समितीची प्रश्नांची सरबती

खासगी कंत्राटदार कचरा पेट्या देणार तर अधिक पेट्यांची खरेदी कशाला? पेट्या खरेदीचा प्रस्ताव अध्यक्षांनी ठेवला