चक्क पतीनेच केले पत्नीचे अपहरण...

नाशिक : वैदिक पद्धतीने लग्न केल्यानंतर १९ वर्षीय पत्नी किरकोळ कारणावरून नवऱ्याशी न पटल्याने माहेरी गेली.‌ आईमुळेच बायको नांदायला येत नसल्याचा पतीचा समज झाला. त्याच रागातून त्याने आई सोबत रस्त्याने पायी जाणाऱ्या पत्नीचे तीन मित्रांसह एका कारमधून अपहरण केल्याची घटना तालुक्यातील पांगरी येथे दोन दिवसांपूर्वी घडली. दरम्यान, अपहृत नवरी सह तिच्या पतीला पोलिसांनी शिर्डी येथून ताब्यात घेत अटक केली आहे. भविष्याचा विचार करून दोन्ही बाजूकडून या प्रकरणी समेट घडवत पडदा टाकण्यात आला.


दुसरीकडे पोलिसांची मात्र या प्रकरणी चांगलीच दमछाक झाली. त्यामुळे या अनोख्या अपहरणाची चर्चा परिसरात रंगली आहे. पांगरी येथील एका १९ वर्षीय तरुणीने आई-वडिलांच्या इच्छे विरोधात २० जानेवारी २०२५ रोजी गावातीलच वैभव अण्णासाहेब पवार (२३) या तरुणाशी वैदिक पद्धतीने विवाह केला. ती त्याच्या सोबतच राहत असताना अचानक दोघांमध्ये किरकोळ भांडण झाले. त्यातून ती माहेरी आली. ती पुन्हा सासरी येत नसल्याचे बघून नवऱ्याने तीन मित्रांना सोबत घेत पांगरी बस स्थानक परिसरात ही मुलगी आई आणि भावासोबत पायी जात असताना आईला ढकलून देत मुलीला कारमध्ये घालून तीचे अपहरण केले. दरम्यान, अपहरणाचा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. वावी पोलिसांना या संदर्भात माहिती देण्यात आल्यानंतर त्यांच्याकडूनही तपास चक्र वेगाने फिरली.


अशातच तरुणाने या मुलीला प्रारंभी संगमनेर येथे कारने नेत तेथे तिला उतरून घेत तीन मित्रांना कारसह माघारी पाठवून दिले. त्यानंतर या पती-पत्नीने बसने लोणी आणि नंतर शिर्डी येथे प्रवास केला. तिथून ते गावी परतत असताना वावी पोलिसांनी त्यांचे लोकेशन ट्रॅक करत शिर्डी येथून त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर मुलीच्या फिर्यादीवरून नवऱ्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. या संदर्भात वावी पोलिसांनी तरुणाला अटक केली असून त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, रागा वैतागत नवऱ्याविरोधात अपहरणाची फिर्याद दिलेली मुलगीच गजाआड असलेल्या पतीला जेवणाचा डबा घेऊन आल्याने पोलिसांना डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली. अपहरणात त्याला मदत करणाऱ्या तीन संशयीतांचा शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांनी दिली.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात