Shahid Diwas : २३ मार्च शहिद दिवस का साजरा केला जातो ?

मुंबई : भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या स्मरणार्थ देशभरात शहीद दिवस (shahid diwas) साजरा केला जातो. इंग्रजांनी २३ मार्च रोजी भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव या भारतमातेच्या वीर पुत्रांना फाशी दिली होती. या वीर पुत्रांच्या बलिदानामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा मिळाली. त्यामुळेच आजचा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो.



भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना इंग्रजांनी का दिली फाशी ?


इंग्रजांनी भारतीयांसाठीच्या तयार केलेल्या कायद्यांमध्ये बदल करण्याबाबत अभ्यास करुन शिफारशी करण्यासाठी सायमन आयोग अर्थात सायमन कमिशन नेमले होते. भारतीयांसाठीचे कायदे इंग्रजांनी तयार करण्याला विरोध म्हणून भारतात सर्वत्र या शिष्टमंडळाचा काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला होता. ‘सायमन परत जा’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमारात लाला लजपतराय जखमी झाले. काही दिवसांतच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना १९२८ मध्ये घडली. क्रांतिकारकांनी लाला लजपतराय यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या लाहोर पोलिस ठाण्यातील इंग्रज अधिकारी साँडर्स याला ठार मारण्याचे ठरवले. त्याप्रमाणे लाला लजपतराय यांच्या पहिल्या मासिक श्राद्धाच्या दिवशी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे तिघेही वेष बदलून पोलिस अधिकाऱ्यांच्‍या निवासस्थानाकडे गेले. साँडर्स दिसताच सुखदेव यांनी संकेत दिला. भगतसिंग आणि राजगुरू यांनी एकाच वेळी गोळ्या झाडून त्याचा बळी घेतला. भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांनी इंग्रजांविरुद्ध बंड करुन ब्रिटीश पोलिस अधिकारी जॉन. पी. साँडर्सची हत्या केली. याच प्रकरणात दोषी ठरवून २३ मार्च १९३१ रोजी लाहोरच्या तुरुंगात तिन्ही क्रांतीकारकांना फाशी देण्यात आली होती. या तिन्ही तरुण देशभक्तांच्या फाशीनंतर तमाम भारतीयांचं रक्त आणखी पेटून उठलं. त्यांच्या बलिदानानंतर स्वांतत्र्यांची चळवळ अधिक प्रखर झाली.

Comments
Add Comment

तब्बल २ लाख ४४ हजार कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प, राखीव निधी केवळ ३६ हजार कोटी

मुंबई: मुंबई महापालिच्यावतीने पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले असून आता या प्रकल्पांचा खर्च २ लाख ४४

क्रांतिसूर्य स्वा.सावरकर यांच्या सन्मानार्थ मुंबईतून किमान १० हजार स्वाक्षऱ्यांचे पत्र केंद्र व राज्य सरकारला पाठवणार

मुंबई: मुंबईमधील दादर पश्चिमेकडील बालमोह शाळेशेजारील सावरकर सदन हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

Satara: कराडमधील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

सातारा: कराडमधील गाजलेल्या यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील ११२ कोटी १० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी आणि

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील

दक्षिण मुंबईतील बेलासीस पुलाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव; मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार ब्रिटिशांच्या