Maharashtra Navnirman Sena (MNS) chief Raj Thackeray addresses the party workers
मुंबई : राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज (दि २३) रवींद्र नाट्यमंदिरात मनसेची बैठक घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी मनसेतील नवीन पदे आणि पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. त्यानुसार फक्त विभाग अध्यक्ष असलेल्या मनसेत आता शहर अध्यक्ष आणि उप-शहर अध्यक्ष या नव्या पदांची निर्मिती करण्यात आली आहे. पक्षाच्या मुंबई शहराध्यक्षपदाची जबाबदारी संदीप देशपांडे यांना देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्षसंघटनेत मोठे फेरबदल करण्याचे संकेत दिले होते. पक्षात कोणती पदे असतील, त्याची पुनर्रचना कशी असेल, पदाधिकाऱ्यांच्या आचारसंहितेत कोणते मुद्दे असावेत, याचा अभ्यास करून मागील काही दिवसांपासून राज ठाकरे हे स्वत: याबाबतचा आराखडा तयार करत होते. त्यानुसार आज मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत केंद्रीय समिती स्थापन करण्यासह महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मुंबईत पक्षाला बळकटी देण्यासाठी काय करायला हवं, याबाबत विचारमंथन करण्यात आले. संदीप देशपांडे यांना पक्षाच्या मुंबई शहराध्यक्षपदाची तर मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यावर गट अध्यक्षांच्या कामाचा आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर मनसेच्या शाखा अध्यक्षांच्या कामाचा आढावा घेण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे समजते. याशिवाय, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर यांच्यासह आणखी काही नेत्यांना मनसेच्या केंद्रीय समितीत स्थान देण्यात आले आहे.
ही केंद्रीय समिती मनसेतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर देखरेख ठेवणार आहे. आणि मुंबईच्या विभाग अध्यक्ष यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नितीन सरदेसाई यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर ३० मार्च रोजी नव वर्षाच्या मुहूर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसे गुढीपाडवा मेळावा होईल. या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
मुंबई : कधी मराठी - अमराठी तर कधी भूमिपुत्रांचे हक्क तर कधी उद्धव - राज…
जम्मू-काश्मीरसह उत्तर भारत हादरले काबूल : अफगाणिस्तान-ताजीकिस्तान सीमावर्ती भागात शनिवारी (दि. १९) भूकंपाचे तीव्र धक्के…
कोलकाता : वक्फ दुरुस्ती विधेयकावरून पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचारावर भाजप नेते आणि सुप्रसिद्धी अभिनेता मिथुन…
नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…
नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…