Shahid Diwas : २३ मार्च शहिद दिवस का साजरा केला जातो ?

मुंबई : भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या स्मरणार्थ देशभरात शहीद दिवस (shahid diwas) साजरा केला जातो. इंग्रजांनी २३ मार्च रोजी भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव या भारतमातेच्या वीर पुत्रांना फाशी दिली होती. या वीर पुत्रांच्या बलिदानामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा मिळाली. त्यामुळेच आजचा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो.



भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना इंग्रजांनी का दिली फाशी ?


इंग्रजांनी भारतीयांसाठीच्या तयार केलेल्या कायद्यांमध्ये बदल करण्याबाबत अभ्यास करुन शिफारशी करण्यासाठी सायमन आयोग अर्थात सायमन कमिशन नेमले होते. भारतीयांसाठीचे कायदे इंग्रजांनी तयार करण्याला विरोध म्हणून भारतात सर्वत्र या शिष्टमंडळाचा काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला होता. ‘सायमन परत जा’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमारात लाला लजपतराय जखमी झाले. काही दिवसांतच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना १९२८ मध्ये घडली. क्रांतिकारकांनी लाला लजपतराय यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या लाहोर पोलिस ठाण्यातील इंग्रज अधिकारी साँडर्स याला ठार मारण्याचे ठरवले. त्याप्रमाणे लाला लजपतराय यांच्या पहिल्या मासिक श्राद्धाच्या दिवशी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे तिघेही वेष बदलून पोलिस अधिकाऱ्यांच्‍या निवासस्थानाकडे गेले. साँडर्स दिसताच सुखदेव यांनी संकेत दिला. भगतसिंग आणि राजगुरू यांनी एकाच वेळी गोळ्या झाडून त्याचा बळी घेतला. भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांनी इंग्रजांविरुद्ध बंड करुन ब्रिटीश पोलिस अधिकारी जॉन. पी. साँडर्सची हत्या केली. याच प्रकरणात दोषी ठरवून २३ मार्च १९३१ रोजी लाहोरच्या तुरुंगात तिन्ही क्रांतीकारकांना फाशी देण्यात आली होती. या तिन्ही तरुण देशभक्तांच्या फाशीनंतर तमाम भारतीयांचं रक्त आणखी पेटून उठलं. त्यांच्या बलिदानानंतर स्वांतत्र्यांची चळवळ अधिक प्रखर झाली.

Comments
Add Comment

Old Building : जुन्या इमारती अतिधोकादायक दाखवण्यामागे सल्लागारांचा खेळ?

मुंबई  : मुंबईतील ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट (संरचनात्मक परीक्षण) करताना, अनेक सल्लागार

Devendra Fadnavis : इंधनाचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर

मुंबई : इराण-अमेरिका युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा परिणाम देशातील पेट्रोलियम

Mrinal Tai Gore Flyover Extension : अंधेरी,जोगेश्वरी, गोरेगावकरांचा वेळ वाचणार, मृणालताई गोरे विस्तारीत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव पश्चिम येथील राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोडदरम्यानच्या मृणालताई गोरे

The Fort owners : किल्लेदारांनी बोटीतून केली मिठी नदीची सैर... दाखवला नदीत कचऱ्यासह तीन फुटांपर्यंतचा गाळ

मुंबई : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या नालेसफाईच्या कामाला सुरुवात असून सत्ताधारी पक्षाकडून प्रत्येक

Chandrashekar Bawankule : देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याच्या प्रारूपाला स्थगिती

सुधारित प्रारूपासाठी खारगे समिती स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : महाराष्ट्रातील

Weekly Public Transport Day in BKC : बीकेसीमध्ये दर शुक्रवारी पाळणार ‘साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन’

- इंधन बचतीसाठी निर्णय; २ लाख कर्मचारी करणार सार्वजनिक प्रवासी वाहनांचा वापर मुंबई : जागतिक इंधन तुटवड्याच्या