नागपूरमधून संचारबंदी हटवली

नागपूर : नागपूर पोलिसांनी रविवार २३ मार्च २०२५ रोजी दुपारी तीन वाजल्यापासून कोतवाली, गणेशपेठ, यशोधरानगर आणि तहसीलसह सर्व संचारबंदी असलेल्या भागांमधून संचारबंदी हटवली आहे. याआधी १७ मार्च रोजी शहरात उसळलेल्या हिंसाचारानंतर नागपूरचे पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १० पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू केली होती. आता परिस्थिती नियंत्रणात आल्याने आणि शांतता प्रस्थापित झाल्याने संपूर्ण शहर संचारबंदी मुक्त झाले आहे.



संचारबंदीच्या काळात संबंधित भागांतील सर्व दुकानं, बाजारपेठा, शाळा आणि व्यावसायिक आस्थापनांना बंद ठेवले होते. सततच्या बंदमुळे सामान्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. अखेर परिस्थिती नियंत्रणात आल्यावर पोलिसांनी संचारबंदी हटवली आहे. यामुळे नारिकांना दिलासा मिळाला आहे.



याआधी संचारबंदीच्या काळात परिस्थिती थोडी नियंत्रणात आल्यावर गणेशपेठ, कोतवाली आणि तहसील भागात नागरिकांना सकाळी ७ ते १० या वेळेत आवश्यक वस्तू खरेदीसाठी सवलत देण्यात आली होती. मात्र, यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी कायम होती. नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी होती. रविवारी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर नागपूर पोलिसांनी संपूर्ण शहरातून संचारबंदी हटवली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता ठेवावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

नागपुरातील हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत १०४ दंगलखोरांची ओळख पटली असून, त्यापैकी ९२ जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित १२ अल्पवयीन आरोपींवर कायद्यानुसार कारवाई सुरू आहे. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि इतरांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवरही कारवाई सुरू आहे. दंगल करुन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांकडूनच दंड रुपाने वसुली करुन सरकार हानीची भरपाई करणार आहे. ज्यांची दंड देण्याची ऐपत नाही अशा आरोपींची मालमत्ता विकून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच