Aurangzeb tomb : औरंगजेब कबरीच्या वादामुळे पर्यटन ठप्प!

  60

छत्रपती संभाजीनगर : औरंगजेब एक जुलमी बादशहा होता. त्याची कबर महाराष्ट्रात नको, अशी राजकीय मागणी होऊ लागली आहे. ही मागणी सुरू झाल्यापासून औरंगजेबाच्या खुलताबादमधील कबरी भोवती पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. या घडामोडींचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. अजिंठा आणि वेरुळ लेणी, दौलताबाद किल्ला तसेच मुघलकालीन वास्तू बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे, असे स्थानिक सांगत आहेत. शाळा महाविद्यालयांच्या परीक्षांमुळेही पर्यटनात घट झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.



जगप्रसिद्ध वेरुळ लेणी, बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदीर, खुलताबाद भद्रा मारूती तसेच सुफी संताचा दर्गा खुलताबाद परिसरात असल्याने या भागात कायम पर्यटकांचा राबता असतो. मात्र, मागील काही दिवसांत औरंगजेब कबरीवरुन सुरू झालेल्या वादाचा परिणाम पर्यटनावर होत आहे. यामुळे परिसरातील हॉटेल आणि लॉजिंग व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. पर्यटकांनी आगाऊ केलेली नोंदणी रद्द करत येथे येण्याचे टाळल्याचे दिसून येत आहे. विविध भागातील पर्यटक सध्या वातावरण कसे आहे ? अशी विचारणा करूनच पर्यटनाची आखणी करत आहेत. दरम्यान, वेरूळ, खुलताबाद परिसरात जवळपास १०० चांगल्या दर्जाच्या रिसोर्ट, हॉटेल, लॉजिंग आहेत. मात्र, औरंगजेब कबर प्रकरणामुळे गेल्या १५ दिवसापासून आगाऊ नोंदणी धडाधड रद्द होत असल्याने व्यावसायिक व्यथित झाले आहेत. शिर्डी, वेरूळ, खुलताबाद, दौलताबाद, छत्रपती संभाजीनगर असे पर्यटनाचे मोठे सर्कीट असल्याने या ठिकाणी देशविदेशातून पर्यटक येत असतात. त्यामुळे हॉटेलची ऑनलाईन बुकींग महिना पंधरा दिवस अगोदर होते. मात्र, मागील काही दिवसांपासून केवळ औरंगजेब कबर प्रकरणामुळे जो वाद व गदारोळ सुरू असल्याने बुकींग रद्द होत आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक संकटात सापडले आहेत.

Comments
Add Comment

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम