Pune News : पुणे हादरलं ! जन्मदात्यानेच घेतला ३ वर्षीय मुलाचा जीव; "म्हणाला हे मुलं माझं नाहीच"

पुणे : पुण्यात (Pune) गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. अशातच पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जन्मदात्याने पत्नीवरच्या संशयामुळे पोटच्या ३ वर्षीय मुलाची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना चंदननगर परिसरात घडली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.



पुण्यातील (Pune) चंदनगर परिसरात नराधम माधव साधुराव टीकेटी त्याच्या कुटुंबा सोबत राहत होता. आरोपी माधव आणि पत्नी उच्चशिक्षित आहेत. त्यांना आठ वर्षांची मुलगी आणि साडेतीन वर्षाचा मुलगा होता. माधव हा कंपनीत कामाला होता; पण काही महिन्यांपूर्वी त्याला कामावरून काढून टाकले होते; तसेच तो सतत दारूच्या नशेत असतो. माधव पत्नीवर नेहमी चारित्र्याचा संशय घेत होता. गुरुवारी सकाळी त्याचे पत्नीशी भांडण झाले. भांडणाच्या आवाजावरून त्यांचा तीन वर्षीय मुलगा (हिंमत माधव टीकेटी) झोपेतून उठला. दुपारच्या सुमारास आरोपी घरातून बाहेर पडत असताना हिंमत त्याच्या मागे लागला. त्यामुळे आरोपीने मुलाला दुचाकीवर बसवून सोबत नेले. खराडी परिसरात फिरल्यावर त्याने दारू प्यायली आणि एका दुकानातून धारदार चाकू खरेदी केला. त्यानंतर खराडी दर्ग्यासमोरील फॉरेस्ट पार्क परिसरात निर्जनस्थळी जाऊन चाकूने मुलाचा गळा चिरून खून केला.


मुलाला तिथेच टाकून तो सायंकाळी वडगाव शेरीतील एका लॉजमध्ये जाऊन झोपला. रात्रीचे नऊ वाजूनही पती आणि मुलगा घरी न आल्याने आईने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी परिसरातील ‘सीसीटीव्ही’ आणि तांत्रिक विश्लेषणावरून आरोपीचा शोध घेतला. भरपूर दारू प्यायल्याने त्याला मुलाचा ठावठिकाणा सांगता येत नव्हता. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर आरोपीने कबुली दिली आहे. दरम्यान या नराधम बापाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,