Mumbai : मुंबई सेंट्रल - गांधीनगर कॅपिटल वंदे भारत एक्स्प्रेसला आणंद स्थानकावर अतिरिक्त थांबा

मुंबई : पश्चिम रेल्वेतर्फे मुंबई सेंट्रल आणि अहमदाबाद धावणाऱ्या गांधीनगर राजधानी - मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. गाडी क्रमांक २०९०१/२०९०२ मुंबई सेंट्रल - गांधीनगर कॅपिटल वंदे भारत एक्स्प्रेसला २३ मार्चपासून प्रायोगिक तत्वावर आणंद स्टेशनवर अतिरिक्त थांबा देण्यात आला. आणंद स्थानकावर अतिरिक्त थांबा दिल्याने मुंबई सेंट्रल आणि अहमदाबाद स्थानकांवरील गाडी वेळेत बदल करण्यात येणार आहे.



रविवार २३ मार्चपासून मुंबई सेंट्रल - गांधीनगर कॅपिटल वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी १०.३८ वाजता आणंद स्थानकावर पोहोचेल आणि सकाळी १०.४० वाजता निघेल. इतर स्थानकांवर वेळेत कोणताही बदल होणार नाही. परतीच्या दिशेने, गांधीनगर राजधानी - मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्स्प्रेस आणंद स्थानकावर दुपारी ३.३० वाजता पोहोचेल आणि ३.३२ वाजता निघेल. अतिरिक्त थांब्यामुळे, अहमदाबाद स्थानकावरील गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. ही गाडी आता अहमदाबाद स्थानकावर दुपारी २.५०/३.०० ऐवजी २.४५/२.५५ वाजता पोहोचेल/प्रस्थान करेल. तसेच, ही गाडी मुंबई सेंट्रल स्थानकावर रात्री ८.२५ ऐवजी ८.३० वाजता पोहोचेल.

Comments
Add Comment

कांदळवन क्षेत्रात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झेप्टोची बेकायदा गोदामे

आमदार संजय उपाध्याय यांचा गंभीर आरोप; पाहणीसाठी गेलेल्या लोकप्रतिनिधींना बाऊन्सर्सकडून दमदाटी मुंबई : मुंबईची

मानखुर्दचा SMS एन्व्होक्लीनचा भस्मीकरण प्रकल्प २१ महिन्यांत हलविणार

मुंबई : मानखुर्द व शिवाजीनगर भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन मानखुर्द शिवाजी विधानसभा क्षेत्रातील

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कॅनडाचे तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरणार

मुंबई : महाराष्ट्रातील शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी राज्य सरकारने आता जागतिक स्तरावर पावले उचलली आहेत. कृषी

भूमि अभिलेख विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर, नव्या ९९४ पदांची भर पडणार

मुंबई : जमिनीच्या कायदेशीर नोंदी वेगवान होऊन जनतेला दिलासा देण्यासाठी राज्याच्या भूमिअभिलेख विभागाचा

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर सरकारचा बडगा

३१ मार्चपर्यंत दंडवसुलीचे आदेश; सुनावणीनंतर १५ दिवसांच्या आत वसुलीची प्रक्रिया मुंबई : राज्यातील अवैध गौण खनिज

रस्ते बांधण्याचे काम ९० टक्के भूसंपादन झाल्यानंतरच सुरू होणार

मुंबई : भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन ९० टक्के जमीन प्रत्यक्ष ताब्यात आल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरूवात