Mumbai : मुंबई सेंट्रल - गांधीनगर कॅपिटल वंदे भारत एक्स्प्रेसला आणंद स्थानकावर अतिरिक्त थांबा

मुंबई : पश्चिम रेल्वेतर्फे मुंबई सेंट्रल आणि अहमदाबाद धावणाऱ्या गांधीनगर राजधानी - मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. गाडी क्रमांक २०९०१/२०९०२ मुंबई सेंट्रल - गांधीनगर कॅपिटल वंदे भारत एक्स्प्रेसला २३ मार्चपासून प्रायोगिक तत्वावर आणंद स्टेशनवर अतिरिक्त थांबा देण्यात आला. आणंद स्थानकावर अतिरिक्त थांबा दिल्याने मुंबई सेंट्रल आणि अहमदाबाद स्थानकांवरील गाडी वेळेत बदल करण्यात येणार आहे.



रविवार २३ मार्चपासून मुंबई सेंट्रल - गांधीनगर कॅपिटल वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी १०.३८ वाजता आणंद स्थानकावर पोहोचेल आणि सकाळी १०.४० वाजता निघेल. इतर स्थानकांवर वेळेत कोणताही बदल होणार नाही. परतीच्या दिशेने, गांधीनगर राजधानी - मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्स्प्रेस आणंद स्थानकावर दुपारी ३.३० वाजता पोहोचेल आणि ३.३२ वाजता निघेल. अतिरिक्त थांब्यामुळे, अहमदाबाद स्थानकावरील गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. ही गाडी आता अहमदाबाद स्थानकावर दुपारी २.५०/३.०० ऐवजी २.४५/२.५५ वाजता पोहोचेल/प्रस्थान करेल. तसेच, ही गाडी मुंबई सेंट्रल स्थानकावर रात्री ८.२५ ऐवजी ८.३० वाजता पोहोचेल.

Comments
Add Comment

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेवर दि. २५ ते २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर

Mumbai Megablock : मेगा 'ब्लॉक डे' मुंबईकरांना सतावणार! 'लाईफलाईन' लोकलची दुरुस्ती; कोणत्या मार्गांवर सेवा पूर्णपणे बंद राहणार?

मुंबई : मुंबईची लाईफलाइन (Mumbai Lifeline) असलेली उपनगरीय रेल्वे (Suburban Railway) लाखो प्रवाशांना घेऊन अविरत धावत असते. या लोकलच्या

यंदाच्या छठ पुजेत विरोधही होणार मावळ, काय आहे कारण...

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी यंदा छठ पुजेच्या निमित्ताने

महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी १९,३१७ नवीन टॅबची खरेदी

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले टॅब आता जुने झाल्याने नव्याने

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा