Mumbai : मुंबई सेंट्रल - गांधीनगर कॅपिटल वंदे भारत एक्स्प्रेसला आणंद स्थानकावर अतिरिक्त थांबा

मुंबई : पश्चिम रेल्वेतर्फे मुंबई सेंट्रल आणि अहमदाबाद धावणाऱ्या गांधीनगर राजधानी - मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. गाडी क्रमांक २०९०१/२०९०२ मुंबई सेंट्रल - गांधीनगर कॅपिटल वंदे भारत एक्स्प्रेसला २३ मार्चपासून प्रायोगिक तत्वावर आणंद स्टेशनवर अतिरिक्त थांबा देण्यात आला. आणंद स्थानकावर अतिरिक्त थांबा दिल्याने मुंबई सेंट्रल आणि अहमदाबाद स्थानकांवरील गाडी वेळेत बदल करण्यात येणार आहे.



रविवार २३ मार्चपासून मुंबई सेंट्रल - गांधीनगर कॅपिटल वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी १०.३८ वाजता आणंद स्थानकावर पोहोचेल आणि सकाळी १०.४० वाजता निघेल. इतर स्थानकांवर वेळेत कोणताही बदल होणार नाही. परतीच्या दिशेने, गांधीनगर राजधानी - मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्स्प्रेस आणंद स्थानकावर दुपारी ३.३० वाजता पोहोचेल आणि ३.३२ वाजता निघेल. अतिरिक्त थांब्यामुळे, अहमदाबाद स्थानकावरील गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. ही गाडी आता अहमदाबाद स्थानकावर दुपारी २.५०/३.०० ऐवजी २.४५/२.५५ वाजता पोहोचेल/प्रस्थान करेल. तसेच, ही गाडी मुंबई सेंट्रल स्थानकावर रात्री ८.२५ ऐवजी ८.३० वाजता पोहोचेल.

Comments
Add Comment

महापालिका आयुक्तांनी घेतला मुंबईतील दोन प्रमुख रस्ते प्रकल्प कामांचा आढावा, दिले असे निर्देश

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे ते भाईंदर प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक

मुंबई २०३० पर्यंत रेबीजमुक्त करणार, महापालिकेचा निर्धार

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

मुंबई: मुंबईत शुक्रवारी रात्री थरारक सुटकेची घटना घडली. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या खड्ड्यात तरूणाचा

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,

मुबंईत येत्या मंगळवारपासून तीन दिवस १० टक्के पाणीकपात

मुंबई : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील १०० किलोव्हॅट