Nashik Fire : नाशकात अग्नितांडव! पिंपळगावमध्ये बांबूच्या गोडाऊनला भीषण आग; १५ ते २० दुकाने आगीच्या भक्षस्थानी

नाशिक : नाशिकमधील (Nashik News) निफाड तालुक्यात भीषण आग लागल्याची घटना घडली. पिंपळगाव शहरातील एका बांबू गोडाऊनला ही आग लागली असून अवघ्या काही क्षणात आगीने रौद्र रुप धारण केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यात यश आले. मात्र यामध्ये १५ ते २० दुकाने जळून खाक (Nashik Fire) झाली असून मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचे समोर आले आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे भीषण आग लागली. घोडके नगर परिसरात असलेल्या एचडीएफसी बँक च्या पाठीमागील भागामध्ये एका रद्दीच्या दुकानालाही आग लागली होती. तसेच त्या नजीकच्या भेळ भत्ता बनवण्याच्या कारखान्यात देखील ही आग लागली. या ठिकाणी असलेल्या गॅसच्या टाक्यांचा स्फोट झाल्याने रौद्ररूप धारण केले. त्यात शेजारी असलेल्या बांबूच्या व लाकडांच्या वखारीला देखील ही आग लागली. त्यामुळे आग आणखी भडकली. आग एवढी भीषण होती की ओझर एच एल, पिंपळगाव बसवंत, निफाड येथून तीन अग्निशमन दलाचे बंब आग विझवण्याचे प्रयत्न करत होते. (Nashik Fire)


दरम्यान, तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने यात कसलीही जीवितहानी झाली नसली तरीही लाखोंचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर द्यापही काही ठिकाणी ही आग भडकत असल्याने अग्निशमन दल घटनास्थळी तळ ठोकून आहे. (Nashik Fire)

Comments
Add Comment

Maharashtra Heavy Rain : राज्यात पावसाचा कहर! १७ NDRF आणि 6 SDRF पथके तैनात; लोणावळ्यात तब्बल ६७० मिमी पावसाची नोंद

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात

इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीत वारकऱ्यांची गैरसोय; मुंबई डबेवाले करणार भोजन व निवासाची व्यवस्था

Mumbai  : खेड, मावळ, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे

Heavy Rain in Mumbai Pune : पावसाचा कहर! मुंबई-ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्यात १२ जुलैपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी उद्या

Flood in Indrayani : इंद्रायणीला पूर; वारकऱ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आवाहन! आळंदीत न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीकडे निघालेल्या वारकरी आणि भाविकांसाठी राज्य

TET Exam Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! चारही आरोपींना १८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

भिवंडी : राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात मोठी घडामोड झाली