Nashik Fire : नाशकात अग्नितांडव! पिंपळगावमध्ये बांबूच्या गोडाऊनला भीषण आग; १५ ते २० दुकाने आगीच्या भक्षस्थानी

नाशिक : नाशिकमधील (Nashik News) निफाड तालुक्यात भीषण आग लागल्याची घटना घडली. पिंपळगाव शहरातील एका बांबू गोडाऊनला ही आग लागली असून अवघ्या काही क्षणात आगीने रौद्र रुप धारण केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यात यश आले. मात्र यामध्ये १५ ते २० दुकाने जळून खाक (Nashik Fire) झाली असून मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचे समोर आले आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे भीषण आग लागली. घोडके नगर परिसरात असलेल्या एचडीएफसी बँक च्या पाठीमागील भागामध्ये एका रद्दीच्या दुकानालाही आग लागली होती. तसेच त्या नजीकच्या भेळ भत्ता बनवण्याच्या कारखान्यात देखील ही आग लागली. या ठिकाणी असलेल्या गॅसच्या टाक्यांचा स्फोट झाल्याने रौद्ररूप धारण केले. त्यात शेजारी असलेल्या बांबूच्या व लाकडांच्या वखारीला देखील ही आग लागली. त्यामुळे आग आणखी भडकली. आग एवढी भीषण होती की ओझर एच एल, पिंपळगाव बसवंत, निफाड येथून तीन अग्निशमन दलाचे बंब आग विझवण्याचे प्रयत्न करत होते. (Nashik Fire)


दरम्यान, तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने यात कसलीही जीवितहानी झाली नसली तरीही लाखोंचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर द्यापही काही ठिकाणी ही आग भडकत असल्याने अग्निशमन दल घटनास्थळी तळ ठोकून आहे. (Nashik Fire)

Comments
Add Comment

Water storage : खरीप हंगामावर वरुणराजाची कृपादृष्टी, नाशिकसह इतर विभागांतील पाणीसाठा किती ? 

Nashik : जून महिना कोरडा गेल्यानंतरही झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणे भरली आहेत. त्यामुळे

Panic in Wardha : वर्ध्यात दहशत! १० गावांत हाय अलर्ट जारी; वनविभाग ॲक्शन मोडमध्ये

वर्धा: महाराष्ट्र आणि देशपातळीवर वन्यजीवांच्या वाढत्या वावरामुळे मानवी वस्त्यांवर आणि शेती परिसरांवर संकट

Nashik-Mumbai Highway : घोटी–सिन्नर फाटा उड्डाणपुलावर ट्रक दुभाजकाला धडकून उलटला अन्...महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

घोटी : नाशिक–मुंबई महामार्गावर (Nashik-Mumbai Highway) घोटी–सिन्नर (Ghoti Sinner) फाटा उड्डाणपुलावर आज एक भीषण अपघात घडला. विटांनी

Mumbai Pune Railway : घाटात दरड कोसळली तरी वाहतूक थांबणार नाही; मुंबई-पुणे रेल्वेप्रवास आता अधिक सुरक्षित, 'हा' मोठा बदल होणार!

मुंबई-पुणे रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. पावसाळ्यात दरडी कोसळल्यामुळे होणारा

Ahilyanagar : नीट परीक्षेत कमी गुण मिळाले अन् विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलले ; सुसाईड नोटमध्ये लिहिलं आत्महत्येचं कारण

Ahilyanagar : नीट परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून १९ वर्षीय विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याची

BENDUR FESTIVAL : सर्जा-राजाप्रती कृतज्ञतेचा उत्सव; महाराष्ट्रातील पारंपरिक 'बेंदूर' सणाची परंपरा आणि महत्त्व

भारतीय संस्कृती ही कृषीसंस्कृतीवर आधारलेली असून, या मातीतील प्रत्येक सण-उत्सव हा थेट प्रकृती आणि