Ahilyanagar : नीट परीक्षेत कमी गुण मिळाले अन् विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलले ; सुसाईड नोटमध्ये लिहिलं आत्महत्येचं कारण

Ahilyanagar : नीट परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून १९ वर्षीय विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात घडली आहे. डॉक्टर होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्याने विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Karjat Suicide News)



राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या


कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील अंकिता सुरेश सांगळे हिने २५ जुलै रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी तिचे वडील आणि भाऊ पंढरपूर येथे दर्शनासाठी गेले होते, तर आई घरकामात व्यस्त होती. अंकिता अभ्यासासाठी स्वतंत्र खोलीत होती. बराच वेळ बाहेर न आल्याने आईने खोलीत जाऊन पाहिले असता ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. त्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. अण्णा सांगळे यांच्या खबरीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Karjat Suicide News)



सुसाईडमध्ये लिहिलं आत्महत्येचे कारण


घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, अंकिताने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये 21 जून 2026 रोजी झालेल्या नीट परीक्षेत 166 गुण मिळाले असून कटऑफ 177 गुण असल्याचे नमूद केले आहे. अपेक्षित यश न मिळाल्याने नैराश्य आले असून डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही. आत्महत्येसाठी आई-वडील आणि भावाला जबाबदार धरू नये, असेही तिने नमूद केले आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांवरील स्पर्धा परीक्षांच्या वाढत्या मानसिक तणावाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Nashik-Mumbai Highway : घोटी–सिन्नर फाटा उड्डाणपुलावर ट्रक दुभाजकाला धडकून उलटला अन्...महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

घोटी : नाशिक–मुंबई महामार्गावर (Nashik-Mumbai Highway) घोटी–सिन्नर (Ghoti Sinner) फाटा उड्डाणपुलावर आज एक भीषण अपघात घडला. विटांनी

Mumbai Pune Railway : घाटात दरड कोसळली तरी वाहतूक थांबणार नाही; मुंबई-पुणे रेल्वेप्रवास आता अधिक सुरक्षित, 'हा' मोठा बदल होणार!

मुंबई-पुणे रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. पावसाळ्यात दरडी कोसळल्यामुळे होणारा

BENDUR FESTIVAL : सर्जा-राजाप्रती कृतज्ञतेचा उत्सव; महाराष्ट्रातील पारंपरिक 'बेंदूर' सणाची परंपरा आणि महत्त्व

भारतीय संस्कृती ही कृषीसंस्कृतीवर आधारलेली असून, या मातीतील प्रत्येक सण-उत्सव हा थेट प्रकृती आणि

Shahapur Rain : शहापूरात पावसाचा कहर! हनुमान धबधब्यावर भीषण दुर्घटना; ५ पर्यटक वाहून गेले

शहापूर : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात (Shahapur Rain) झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे हनुमान धबधब्यावर मोठी

Maharashtra Monsoon Weather : पावसाचा पुन्हा जोर! पुढील २४ तास अतिमहत्त्वाचे; महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

मुंबई : जुलैच्या अखेरच्या आठवड्यात महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. उत्तर-पश्चिम

Dam Water Level : राज्यात ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा, मराठवाड्यात मात्र चिंता कायम

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली