Ahilyanagar : नीट परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून १९ वर्षीय विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात घडली आहे. डॉक्टर होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्याने विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Karjat Suicide News)
सिएटल : अमेरिकेतील सिएटल शहरात एका लोकप्रिय फूड फेस्टिव्हलदरम्यान झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. बाइट ऑफ सिएटल (Bite of Seattle) फेस्टिव्हलमध्ये ...
राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या
कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील अंकिता सुरेश सांगळे हिने २५ जुलै रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी तिचे वडील आणि भाऊ पंढरपूर येथे दर्शनासाठी गेले होते, तर आई घरकामात व्यस्त होती. अंकिता अभ्यासासाठी स्वतंत्र खोलीत होती. बराच वेळ बाहेर न आल्याने आईने खोलीत जाऊन पाहिले असता ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. त्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. अण्णा सांगळे यांच्या खबरीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Karjat Suicide News)
Nashik Simhastha Kumbh Mela : पुढील वर्षी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार असून, त्यासाठी कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. मात्र सिंहस्थ ...
सुसाईडमध्ये लिहिलं आत्महत्येचे कारण
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, अंकिताने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये 21 जून 2026 रोजी झालेल्या नीट परीक्षेत 166 गुण मिळाले असून कटऑफ 177 गुण असल्याचे नमूद केले आहे. अपेक्षित यश न मिळाल्याने नैराश्य आले असून डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही. आत्महत्येसाठी आई-वडील आणि भावाला जबाबदार धरू नये, असेही तिने नमूद केले आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांवरील स्पर्धा परीक्षांच्या वाढत्या मानसिक तणावाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.