Disha Salian case : दिशाच्या प्रकरणात वकिलांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, सखोल तपासाची मागणी

  74

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिवंगत दिशा सालियन हिच्या मृत्यूचा पुन्हा चर्चेत आहे. दिशाच्या वडिलांनी मुंबईच्या उच्च न्यायालयात याचिका करुन दिशाच्या मृत्यूची चौकशी नव्याने करण्याची मागणी केली आहे. दिशावर सामूहिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. उद्धव गटाचे आमदार आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, डीनो मोरिया यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करत आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप दिशाच्या वडिलांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेतून केला आहे. या संदर्भात प्रसारमाध्यमांनी विचारले असता, दिशाच्या वडिलांचे वकील निलेश ओझा यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी सखोल तपास व्हावा, अशी मागणी वकील निलेश ओझा यांनी केली आहे.



दिशाचा मृत्यू कशा प्रकारे झाला याचे नाट्य रुपांतर करावं. तिच्या वजनाएवढी बाहुली करुन ती पोलीस पंचनाम्याआधारे व्हरांड्यात उभी करुन खाली पाडावी. या चाचणीतून मृत्यू कसा झाला हे सत्य बाहेर येईल, असा विश्वास वकील निलेश ओझा यांनी व्यक्त केला. दिशा तसेच याचिकेत नमूद सर्व व्यक्तींचे घटनेच्या दिवशीचे विशिष्ट वेळेतले मोबाईल टॉवर लोकेशन तपासावे; अशीही मागणी वकील निलेश ओझा यांनी केली आहे. कोविडचे कारण पुढे करुन दिशाचे पोस्टमॉर्टेम मृत्यूला ५० तास होऊन गेल्यानंतर करण्यात आले. या उलट चार दिवसांनी सुशांतचा मृत्यू झाला त्यावेळी पोस्टमॉर्टेम पाच तासांच्या आत झाले होते. हे असे करण्यामागचे कारण कळलेच पाहिजे; अशी मागणी वकील निलेश ओझा यांनी केली आहे.

 



एक तक्रार आहे. या प्रकरणात तपास करा. जो योग्य असेल त्याला त्रास होणार नाही. ज्याने अयोग्य असे काही केले असेल त्याला तपासाचा त्रास होईल; असे सांगून वकील निलेश ओझा यांनी दिशाच्या प्रकरणात सखोल तपासच सत्य उलगडेल असे सांगितले.
Comments
Add Comment

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्टच्या बस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टळणार मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी

Mumbai Goa Highwayवरील कशेडी बोगद्याजवळ मोठी दुर्घटना, कोकणात जाणाऱ्या खासगी बसला आग

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी आता सुरू झाली आहे. याच दरम्यान, मुंबई गोवा हायवेवर मोठी दुर्घटना