Disha Salian case : दिशाच्या प्रकरणात वकिलांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, सखोल तपासाची मागणी

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिवंगत दिशा सालियन हिच्या मृत्यूचा पुन्हा चर्चेत आहे. दिशाच्या वडिलांनी मुंबईच्या उच्च न्यायालयात याचिका करुन दिशाच्या मृत्यूची चौकशी नव्याने करण्याची मागणी केली आहे. दिशावर सामूहिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. उद्धव गटाचे आमदार आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, डीनो मोरिया यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करत आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप दिशाच्या वडिलांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेतून केला आहे. या संदर्भात प्रसारमाध्यमांनी विचारले असता, दिशाच्या वडिलांचे वकील निलेश ओझा यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी सखोल तपास व्हावा, अशी मागणी वकील निलेश ओझा यांनी केली आहे.



दिशाचा मृत्यू कशा प्रकारे झाला याचे नाट्य रुपांतर करावं. तिच्या वजनाएवढी बाहुली करुन ती पोलीस पंचनाम्याआधारे व्हरांड्यात उभी करुन खाली पाडावी. या चाचणीतून मृत्यू कसा झाला हे सत्य बाहेर येईल, असा विश्वास वकील निलेश ओझा यांनी व्यक्त केला. दिशा तसेच याचिकेत नमूद सर्व व्यक्तींचे घटनेच्या दिवशीचे विशिष्ट वेळेतले मोबाईल टॉवर लोकेशन तपासावे; अशीही मागणी वकील निलेश ओझा यांनी केली आहे. कोविडचे कारण पुढे करुन दिशाचे पोस्टमॉर्टेम मृत्यूला ५० तास होऊन गेल्यानंतर करण्यात आले. या उलट चार दिवसांनी सुशांतचा मृत्यू झाला त्यावेळी पोस्टमॉर्टेम पाच तासांच्या आत झाले होते. हे असे करण्यामागचे कारण कळलेच पाहिजे; अशी मागणी वकील निलेश ओझा यांनी केली आहे.

 



एक तक्रार आहे. या प्रकरणात तपास करा. जो योग्य असेल त्याला त्रास होणार नाही. ज्याने अयोग्य असे काही केले असेल त्याला तपासाचा त्रास होईल; असे सांगून वकील निलेश ओझा यांनी दिशाच्या प्रकरणात सखोल तपासच सत्य उलगडेल असे सांगितले.
Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण