Disha Salian case : दिशाच्या प्रकरणात वकिलांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, सखोल तपासाची मागणी

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिवंगत दिशा सालियन हिच्या मृत्यूचा पुन्हा चर्चेत आहे. दिशाच्या वडिलांनी मुंबईच्या उच्च न्यायालयात याचिका करुन दिशाच्या मृत्यूची चौकशी नव्याने करण्याची मागणी केली आहे. दिशावर सामूहिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. उद्धव गटाचे आमदार आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, डीनो मोरिया यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करत आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप दिशाच्या वडिलांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेतून केला आहे. या संदर्भात प्रसारमाध्यमांनी विचारले असता, दिशाच्या वडिलांचे वकील निलेश ओझा यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी सखोल तपास व्हावा, अशी मागणी वकील निलेश ओझा यांनी केली आहे.



दिशाचा मृत्यू कशा प्रकारे झाला याचे नाट्य रुपांतर करावं. तिच्या वजनाएवढी बाहुली करुन ती पोलीस पंचनाम्याआधारे व्हरांड्यात उभी करुन खाली पाडावी. या चाचणीतून मृत्यू कसा झाला हे सत्य बाहेर येईल, असा विश्वास वकील निलेश ओझा यांनी व्यक्त केला. दिशा तसेच याचिकेत नमूद सर्व व्यक्तींचे घटनेच्या दिवशीचे विशिष्ट वेळेतले मोबाईल टॉवर लोकेशन तपासावे; अशीही मागणी वकील निलेश ओझा यांनी केली आहे. कोविडचे कारण पुढे करुन दिशाचे पोस्टमॉर्टेम मृत्यूला ५० तास होऊन गेल्यानंतर करण्यात आले. या उलट चार दिवसांनी सुशांतचा मृत्यू झाला त्यावेळी पोस्टमॉर्टेम पाच तासांच्या आत झाले होते. हे असे करण्यामागचे कारण कळलेच पाहिजे; अशी मागणी वकील निलेश ओझा यांनी केली आहे.

 



एक तक्रार आहे. या प्रकरणात तपास करा. जो योग्य असेल त्याला त्रास होणार नाही. ज्याने अयोग्य असे काही केले असेल त्याला तपासाचा त्रास होईल; असे सांगून वकील निलेश ओझा यांनी दिशाच्या प्रकरणात सखोल तपासच सत्य उलगडेल असे सांगितले.
Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून